शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

माणूस म्हणून जगण्याचे बळ जिजाऊंनी दिले : गिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST

बीड : दऱ्याखोऱ्यात माणसाला शोधत आणि त्यांना जोडत स्वराज्याचा पाया उभा करण्याचे विश्वापेक्षा मोठे काम राजमाता जिजाऊंनी केले. बाळ ...

बीड : दऱ्याखोऱ्यात माणसाला शोधत आणि त्यांना जोडत स्वराज्याचा पाया उभा करण्याचे विश्वापेक्षा मोठे काम राजमाता जिजाऊंनी केले. बाळ शिवबावर केलेल्या संस्कारामुळे शिवबा युगप्रवर्तक झाले. त्यातून स्वराज्य प्रस्थापित झाले. महाराष्ट्रात न्यायव्यवस्था निर्माण झाली आणि त्यातून रयतेला माणूस म्हणून जगण्याचे बळ मिळाले. शिवविचार आणि आचाराची आज गरज आहे, तर स्वामी विवेकानंदाच्या तेजस्वी विचारांनी आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. या दोनही विभूती आपले आदर्श असून, महापुरुषाचे विचार आपण अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी केले.

गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्याख्याते राहुल गिरी हे बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. पी. राठोड, तर प्रमुख उपस्थिती म्हणून निवेदक माधव चाटे, उपप्राचार्य आर. एस. सानप, प्रा. एस. एल. पवळ, प्रा. अशोक मुंडे, प्रा. डॉ. अयोध्या पवळ, वराट, दामोधर मगर, प्रा. डॉ. खताळ, रामदास शिंदे, प्रा. डॉ. फाटक, आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शकिला शेख हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल गिरी यांनी ओघवत्या शैलीत विचार व्यक्त करुन उपस्थित विद्यार्थी, शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक पठाण अकबर यांनी केले, तर रामदास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.