शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

माणूस म्हणून जगण्याचे बळ जिजाऊंनी दिले : गिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST

बीड : दऱ्याखोऱ्यात माणसाला शोधत आणि त्यांना जोडत स्वराज्याचा पाया उभा करण्याचे विश्वापेक्षा मोठे काम राजमाता जिजाऊंनी केले. बाळ ...

बीड : दऱ्याखोऱ्यात माणसाला शोधत आणि त्यांना जोडत स्वराज्याचा पाया उभा करण्याचे विश्वापेक्षा मोठे काम राजमाता जिजाऊंनी केले. बाळ शिवबावर केलेल्या संस्कारामुळे शिवबा युगप्रवर्तक झाले. त्यातून स्वराज्य प्रस्थापित झाले. महाराष्ट्रात न्यायव्यवस्था निर्माण झाली आणि त्यातून रयतेला माणूस म्हणून जगण्याचे बळ मिळाले. शिवविचार आणि आचाराची आज गरज आहे, तर स्वामी विवेकानंदाच्या तेजस्वी विचारांनी आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. या दोनही विभूती आपले आदर्श असून, महापुरुषाचे विचार आपण अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी केले.

गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्याख्याते राहुल गिरी हे बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. पी. राठोड, तर प्रमुख उपस्थिती म्हणून निवेदक माधव चाटे, उपप्राचार्य आर. एस. सानप, प्रा. एस. एल. पवळ, प्रा. अशोक मुंडे, प्रा. डॉ. अयोध्या पवळ, वराट, दामोधर मगर, प्रा. डॉ. खताळ, रामदास शिंदे, प्रा. डॉ. फाटक, आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शकिला शेख हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल गिरी यांनी ओघवत्या शैलीत विचार व्यक्त करुन उपस्थित विद्यार्थी, शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक पठाण अकबर यांनी केले, तर रामदास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.