शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

माणूस म्हणून जगण्याचे बळ जिजाऊंनी दिले : गिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST

बीड : दऱ्याखोऱ्यात माणसाला शोधत आणि त्यांना जोडत स्वराज्याचा पाया उभा करण्याचे विश्वापेक्षा मोठे काम राजमाता जिजाऊंनी केले. बाळ ...

बीड : दऱ्याखोऱ्यात माणसाला शोधत आणि त्यांना जोडत स्वराज्याचा पाया उभा करण्याचे विश्वापेक्षा मोठे काम राजमाता जिजाऊंनी केले. बाळ शिवबावर केलेल्या संस्कारामुळे शिवबा युगप्रवर्तक झाले. त्यातून स्वराज्य प्रस्थापित झाले. महाराष्ट्रात न्यायव्यवस्था निर्माण झाली आणि त्यातून रयतेला माणूस म्हणून जगण्याचे बळ मिळाले. शिवविचार आणि आचाराची आज गरज आहे, तर स्वामी विवेकानंदाच्या तेजस्वी विचारांनी आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. या दोनही विभूती आपले आदर्श असून, महापुरुषाचे विचार आपण अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी केले.

गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्याख्याते राहुल गिरी हे बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. पी. राठोड, तर प्रमुख उपस्थिती म्हणून निवेदक माधव चाटे, उपप्राचार्य आर. एस. सानप, प्रा. एस. एल. पवळ, प्रा. अशोक मुंडे, प्रा. डॉ. अयोध्या पवळ, वराट, दामोधर मगर, प्रा. डॉ. खताळ, रामदास शिंदे, प्रा. डॉ. फाटक, आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शकिला शेख हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल गिरी यांनी ओघवत्या शैलीत विचार व्यक्त करुन उपस्थित विद्यार्थी, शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक पठाण अकबर यांनी केले, तर रामदास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.