शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शवदाहिनी बसविण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST

बीड जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या सध्या अंबेजोगाई तालुक्यात सर्वाधिक आहे. याशिवाय अंबेजोगाई शहरात असणाऱ्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केलेल्या ...

बीड जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या सध्या अंबेजोगाई तालुक्यात सर्वाधिक आहे. याशिवाय अंबेजोगाई शहरात असणाऱ्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केलेल्या डीसीसीएच सेंटरमध्ये कोविड रुग्णांवर अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार मिळत असल्याची सत्यता सर्वदूर पसरली असल्यामुळे या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी उपचारासाठी येणारे रुग्णांमध्ये अत्यवस्थ स्थितीत येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी असल्यामुळे मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.

त्यामुळे शहरात शवदाहिनी बसविण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.

कोविड मयतांवर अंत्यसंस्कार करण्याची संपूर्ण जबाबदारी अंबेजोगाई नगरपरिषद कार्यालयावर आहे. या मयत रुग्णांमध्ये अंबेजोगाई शहराबाहेरील मयत रुग्णांची संख्या अधिक असली, तरी नगरपरिषदेच्या वतीने सर्व नियम पाळून कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र, मयतांची संख्या सातत्याने वाढत चालल्यामुळे त्याचा ताण नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर पडतोच आहे.

पालमंत्र्यांनी दिले होते आदेश

२०२० साली कोविडच्या पहिल्या फेजमध्ये कोविड रुग्णांच्या मृत्यूचा वाढता दर लक्षात घेता व अंत्यसंस्कारासाठीच्या जागेचा वाद उफाळून आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा विकास निधीतून अंबेजोगाई व बीड शहरासाठी प्रत्येकी एक शवदाहिनी बसवण्यात येईल, असे स्पष्ट करून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना या संबंधीचे आदेशही त्यांनी दिले होते. मात्र, जिल्हाधिकारी पदावरून रेखावार यांची बदली झाल्यानंतर ही मागणी बाजूला पडली.

शवदाहिनी बनली काळाची गरज

अंबेजोगाई येथे उपचारासाठी येणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या सतत वाढतच चालली आहे. त्यात अत्यवस्थ स्थितीत येणारे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शिवाय स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध आजारांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. उपचार करताना दगावलेल्या अनेक रुग्णांवर वैद्यकीय प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे अंबेजोगाई शहरात शवदाहिनी असणे ही काळाची गरज बनली आहे. पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा याबाबतचे आदेश नव्याने काढण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न.प. केला होता पाठपुरावा

गतवर्षी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा विकास योजना निधीतून अंबेजोगाई शहरात शवदाहिनी बसविण्याची घोषणा करुन तशा सूचना तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांना केल्या होत्या. यानंतर, नगरपरिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावाही केला होता. मात्र, जिल्हाधिकारी रेखावार यांच्या बदलीनंतर शवदाहिनी बसविण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.

- नगराध्यक्ष, राजकिशोर मोदी