शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही अग्रीम देण्यास विमा कंपनीचा नकार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST

बीड : बीड जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसात पडलेल्या खंडामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना मोठा फटका ...

बीड : बीड जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसात पडलेल्या खंडामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या पिकांचे ५० टक्के नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करीत शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानभरपाईच्या २५ % रक्कम अग्रीम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पाठपुरावा केला होता; मात्र आदेश निघाल्यानंतर विमा कंपनीने अशी रक्कम देण्यास नकार दिला आहे.

मूग, उडीद या पिकांसाठी नजर पाहणी करण्याची आवश्यकताच नव्हती. सोयाबीनच्या संभाव्य नुकसानीचे अहवालच आमच्याकडे आले नाहीत आणि आले तरी त्यावरून विमा कंपनी आणि प्रशासन यात दुमत निर्माण झाले तर तंत्रज्ञान आधारित पाहणी करावी लागेल, असे पत्रच विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

बीड जिल्ह्यात ‘ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया’ मार्फत पीक विमा घेतला जातो. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी मोठ्याप्रमाणावर विमा उतरविला गेला. तसेच मूग, उडीद या पिकांचा देखील विमा उतरविण्यात आला. त्यातच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिल्याने या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान,पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी विमा कंपनीला या पिकांची नजरी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळीही मूग आणि उडीद यांची नजरी पाहणी करण्यास कंपनी इच्छुक नव्हती. केवळ सोयाबीनची नजरी पाहणी करू अशी भूमिका कंपनीने घेतली होती; मात्र प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर कंपनीने संयुक्त पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने अग्रीम रक्कम देण्याचे आदेश काढले होते. असे आदेश निघताच कंपनीने आढेवेढे घेण्यास सुरुवात केली आहे.

कंपनीकडून केला जातोय वेळकाढूपणा

मूग आणि उडीद यांच्या बाबतीत अशी अग्रीम देण्याची आवश्यकता नाही. नुकसान झाले असेल तर त्यांची अंतिम नुकसानभरपाईच देऊ. तसेच ज्या काळात पावसाचा खंड म्हटलं आहे, त्या काळात जमिनीत पुरेशी ओल होती अशी भूमिका आता कंपनीने घेतली आहे. सोयाबीनच्या संयुक्त पाहणीचे अहवालच अद्याप आले नाहीत, ते आल्यानंतर निर्णय घेऊ. त्याबद्दल कंपनी आणि प्रशासन यात दुमत निर्माण झाले तर पुन्हा तंत्रज्ञान आधारित तपासणी करू अशी भूमिका कंपनीने घेतली आहे. त्यामुळे अग्रीम नुकसानभरपाई देण्यात कंपनी वेळकाढूपणा करणार असल्याचे चित्र आहे.