शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

औद्योगिक बर्फ ठरतोय आरोग्यास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : औद्योगिक बर्फ नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. रस्त्यावर विकला जाणारा बर्फगोळा, गारीगार, कुल्फी, लिंबू सरबत, उसाचा रस ...

अंबाजोगाई : औद्योगिक बर्फ नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. रस्त्यावर विकला जाणारा बर्फगोळा, गारीगार, कुल्फी, लिंबू सरबत, उसाचा रस आदींमध्ये सर्रास वापला जाणारा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होते? असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे अन्न-औषध प्रशासन विभाग सर्रास डोळेझाक करीत असल्याचा आरोप होते? आहे. तापमानाने चाळिशी ओलांडलेल्या अंगाची लाहीलाही होते? आहे. त्यामुळे शीतपेय विक्रेत्यांकडे गर्दी वाढू लागली आहे. बर्फाचा गोळेवाला, सरबतवाला दिसल्यावर अनेकांना मोह आवरत नाही. चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, रस किंवा अन्य पेयात टाकण्यात येणारा बर्फ कुठून येतो. तो कसा तयार होतो, बर्फ तयार करण्याच्या जागी आरोग्यदायी वातावरण आहे की,नाही याची कुणीही खातरजमा करत नाही. बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या कुलिंगसाठीच अखाद्य बर्फ तयार करतात.

'आईसक्युब' हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोजक्याच ठिकाणी होतो. तर कुलिंगसाठीचा बर्फ कमी खर्चिक असल्याने तो मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरला जात असल्याचे वास्तव आहे. बर्फ बनविणाऱ्या कंपन्या औद्योगिक वापराचा बर्फ मोठ्या आकाराचा व जास्त काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनांना थंडावा देण्यासाठी तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतानाही अन्न-औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय सुरू आहे.

अशुद्ध पाण्यापासून बर्फ

पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची खातरजमा होत नाही. बर्फासाठी वापरात येणारे पाणी निर्जंतूक आहे की नाही, याचीही तपासणी होत नाही. बहुसंख्य बर्फ अस्वच्छ पाण्यापासूनच तयार असल्याचे चित्र आहे. बर्फ साठवण्याची जागा स्वच्छ नसते. बर्फाच्या लाद्यांना गुंडाळली जाणारी पोती घाणेरडी असतात. वितळणाऱ्या बर्फाचे पाणी पोत्याखाली साठून चिखल व नंतर डबके तयार होते. दिवसभर बर्फ त्यातच असतो.