शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

डोंगराला आग लागल्याने शेकडो झाडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST

बीड : जिल्ह्यात डोंगरपट्ट्यात आग लावण्याचे प्रकार वाढत असून, मागील काही दिवसांत तीन ठिकाणी मोठी आग लागून हजारो वृक्ष ...

बीड : जिल्ह्यात डोंगरपट्ट्यात आग लावण्याचे प्रकार वाढत असून, मागील काही दिवसांत तीन ठिकाणी मोठी आग लागून हजारो वृक्ष जळून खाक झाले आहेत. १३ मार्च रोजी मध्यरात्री बीड तालुक्यातील पिंपरनई येथील डोंगरावर लागलेल्या भीषण आगीत जवळपास १९ हेक्टरवरील सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्ष लागवडीचे नुकसान झाले असून, मोठ्या प्रमाणात झाडे जळाली आहेत. दरम्यान वृक्ष लागवडीतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी अशा प्रकारे डोंगरांना आग लावली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

जिल्ह्यात मागील शासनाच्या काळातील वन विभाग, समाजिक वनीकरण व इतर विभागाच्या माध्यमातून ३३ कोटी वृक्ष लागवड या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन करण्यात आले होते. मात्र, या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधिमंडळात करण्यात आला होता. त्यानुसार या योजनेतील कामांची चौकशी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना करण्यात आली आहे.

तर, पिंपरनई येथील डोंगरपट्ट्यावर आग लागल्यानंतर याची माहिती मिळताच सामाजिक वनीकरण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्थानिकांना सोबत घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी उपलब्ध नसल्यामुळे व हवा जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. अशाच घटना पाटोदा व धारूर तालुक्यांत देखील झाल्या होत्या. तेथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पंचनामा केला होता. तर, पिंपरनई डोंगरावरील आगप्रकरणी सामाजिक वनीकरण विभागाकडून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आग रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची

शेतकरी पावसाळ्यापूर्वी बांध जाळल्यावर चांगले गवत येते या गैरसमजातून जाळून टाकतात, तसेच काही जण डोंगराला देखील आग लावतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची हानी होते. डोंगरपट्ट्यावर ६ व १२ सीटच्या जाळरेषा काढण्याची आवश्यकता आहे. तसेच डोंगरावर बिडी- सिगारेट ओढून त्याची थोटके टाकली, तर अशा घटना घडू शकतात. मोठ्या जंगलात आग निरीक्षण मनोरा उभारणे गरजेचे आहे. वनविभागाकडून डोंगरपट्ट्यातील गावांत जनजागृती करणे गरजेचे आहे. तर आग लागल्याचे समजताच संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करावा, शेतातील कचरा जाळताना आग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे ‌आवाहन वनविभागाने केले आहे.

प्रतिक्रिया

ज्याठिकाणी आगी लागल्या आहेत त्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृतीदेखील केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार दडपणे वगैरे हे आरोप चुकीचे आहेत.

-मधुकर तेलंग, विभागीय वनाधिकारी, बीड

विभागीय आयुक्तांकडे तक्रार

जिल्ह्यातील डोंगरपट्ट्यावर वारंवार लागत असलेले आग प्रकर संशयास्पद असून, याची उच्चस्तरावरून चौकशी करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, तसेच आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी सांगितले.

===Photopath===

130321\132_bed_12_13032021_14.jpg

===Caption===

पिंपरनई डोंगरावरील आगीतील वृक्ष