शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

नशिबाच्या थट्टेवर माणुसकीची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गाव बंद, बाजार, दुकान, शाळा, जत्रा, उरूस बंद. जगायचं कसं, सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. जत्रा, ...

गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गाव बंद, बाजार, दुकान, शाळा, जत्रा, उरूस बंद. जगायचं कसं, सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. जत्रा, उरूस, तमाशा, सप्ताह, नाटक यावर पोट भरणारी गावकलाकार मंडळी हतबल झाली आहेत. खायला अन्न तर लागतंय, पण आणायचे कोठून, हा प्रश्न आहे. कुटुंबातील तरणीताठी माणसं काहीतरी करून कसा तरी आपला उदरनिर्वाह भागवत आहेत, परंतु ज्या कुटुंबात चार माणसं संपूर्ण दृष्टिहीन आहेत, त्यांनी काय करायचे. या काळात न्याय कुणाकडे मागावा, हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा आहे. उपासमारीची वेळ आलेल्या साक्षाळपिंपरी येथील कुटुंबाला संघर्ष धान्य बॅंकेच्या वतीने धान्याची मदत करण्यात आली.

साक्षाळपिंपरी येथील क्षीरसागर कुटुंबात एकूण सहा माणसे होती. सहाच्या सहा माणसे जन्मत:च अंध होती. मागील एक वर्षाच्या कालावधीत या कुटुंबातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला. आता चार व्यक्ती या कुटुंबात आहेत. ही सर्व मंडळी गावातील जत्रा, उरूस, सप्ताह अशा ठिकाणी जाऊन आपली कला सादर करायची. यात काहीजण गायन करतात, तर काही उत्तम संगीत साथ देतात. त्यांची कला पाहून जत्रेतील लोकांकडून मिळणाऱ्या मदतीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा, परंतु आता हे सर्व बंद झाले आहे. एक वर्षापासून या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. संघर्ष धान्य बँकेने आजपर्यंत या कुटुंबाला कठीण प्रसंगात पाच वेळा धान्य व किराणा पुरविलेले आहे. त्यामुळे संकट काळात क्षीरसागर कुटुंबाला आठवण आली. संघर्ष धान्य बँकेचे सुभाष काळे यांना सम्राट क्षीरसागर याने फोन करून ‘आमच्याकडे थोडे लक्ष द्या, आम्ही खूप बिकट अवस्थेत जगत आहोत. आमचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. कृपया संघर्ष धान्य बँकेतून आम्हाला मदत करा, अशी विनवणी केली’. सुभाष काळे यांनी त्यांना मदतीचे वचन देत मादळमोही येथे संघर्ष धान्य बँकेच्या शाखेतून दोन क्विंटल धान्य रविवारी देण्यात आले. याप्रसंगी संघर्ष धान्य बँकेचे सुरेश भोपळे, सुभाष काळे, बाळासाहेब गावडे, माऊली तळेकर, मारुफ शेख, शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, धर्मराज करपे, सुरेश नवले, संजीवनी भोपळे, सुवर्णा भोपळे इत्यादी उपस्थित होते. संघर्ष धान्य बँकेत धान्य जमा करणारे दातेच आमच्यासाठी खरे परमेश्वराचे अवतार आहेत, अशी प्रतिक्रिया सम्राट क्षीरसागर यांनी व्यक्त केली, तर ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे,’ या म्हणीचा प्रत्यय संघर्ष धान्य बँकेमुळे जिल्ह्यात येत आहे.

===Photopath===

180421\17422950sakharam shinde_img-20210418-wa0022_14.jpg