-स्नेहल संतोष पांडे, गृहिणी, माजलगाव
या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांना या सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र व्यापाऱ्यांचा या अर्थसंकल्पात काहीच फायदा झाला नाही.
--धनराज बंब, किराणा होलसेल व्यापारी, माजलगाव
या बजेटमधून आम्हाला भरपूर अपेक्षा होत्या, परंतु काही फायदा होईल असे वाटत नाही.
--आनंद मोगरेकर, खासगी नोकरदार, माजलगाव
शेतकऱ्यांना या बजेटमधून मोठा फायदा होईल असे वाटत आहे. यातून आम्हाला शेतीमालाला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा आहे. - दत्ता काळे, शेतकरी, माजलगाव
शासनाने या अर्थसंकल्पात आम्हाला करसवलत दिली. यामुळे आता व्यापारात पुन्हा ज्येष्ठ नागरिक येऊ शकतात.
---- ओमप्रकाश मालपाणी, ज्येष्ठ नागरिक, माजलगाव
या बजेटमध्ये सरकारने आयात शुल्क साडेबारावरून साडेसात टक्यांवर आणल्याने दागिन्यांचे भाव कमी होतील, त्यामुळे ग्राहकी वाढेल. -रामराजे रांजवन , सराफा व्यापारी, माजलगाव
केंद्र सरकारच्या बजेटमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचा मानस असल्याने बेरोजगारा युवकांना नोकऱ्या मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
----डिगंबर सपकाळ, युवक, माजलगाव
सरकार बजेट जाहीर करत असते, पण या बजेटबाबत आम्हाला काही घेणे देणे नसून शासनाने केवळ आमच्या मुला बाळांना रोजगार उपलब्ध करून द्यावा -शेख जिलानी, ॲटोरिक्षाचालक, माजलगाव
आम्हाला बजेटच काही माहिती नाही, पण सरकारने आमच्या भाजीपाल्याला भाव वाढवून देण्यासाठी कायदा करावा
----भगवान रासवे, भाजीपालाविक्रेता, माजलगाव