शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

वर्षभरापासून घरातच, मुलेही कंटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

अंबाजोगाई : मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच लॉकडाऊन झाली असून, ...

अंबाजोगाई : मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच लॉकडाऊन झाली असून, कोरोनाच्या भीतीने पालकही मुलांना घराबाहेर पाठवत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये अनेक बदल जाणवत आहेत. विशेषतः मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. त्यामुळे पालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.

मागीलवर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले. परिणामी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यानंतर कालांतराने कोरोना लाट जशी कमी झाली, त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढतच चालल्याने शाळा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला गेला, तर शाळेसोबत खासगी क्लासेसवालेही ऑनलाईन शिकवण्या घेत असल्याने मुलांचा बहुतांश वेळ ऑनलाईन शिक्षणातच जाऊ लागला. परिणामी वर्षभरापासून मुले घरातच कोंडली गेलेली आहेत.

मुक्तपणे मैदानावर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल व टीव्हीव्यतिरिक्त मनोरंजनासाठी दुसरे साधन शिल्लक नाही. घराबाहेर पडण्यासाठी पालकांचा मज्जाव आहे. एकाच ठिकाणी बसून मुले कंटाळली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. पालकांनाही आपल्या मुलांची चिंता सतावत आहे. आपल्या मुलांचा तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत गप्पा, गोष्टी कराव्यात. तसेच छोटे-मोठे खेळ खेळावेत, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

शारीरिक आरोग्यावर परिणामांची भीती

कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले. मुलांना घरीच रहावे लागत आहे. टीव्ही व मोबाईलवरच वेळ घालविणे सुरू आहे. मित्र, सवंगडी भेटत नसल्याने मुलांचे मैदानी खेळ खेळणेच बंद झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी मुलांची मानसिकता समजून त्यांना वेळ द्यावा - डॉ.प्रसाद कुलकर्णी,

बाल रोगतज्ज्ञ, अंबाजोगाई.