शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
3
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
4
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
5
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
6
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
7
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
8
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
9
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
10
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
11
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
12
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
13
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
14
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
15
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
16
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
17
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
18
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
19
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
20
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा

वर्षभरापासून घरातच, मुलेही कंटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

अंबाजोगाई : मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच लॉकडाऊन झाली असून, ...

अंबाजोगाई : मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच लॉकडाऊन झाली असून, कोरोनाच्या भीतीने पालकही मुलांना घराबाहेर पाठवत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये अनेक बदल जाणवत आहेत. विशेषतः मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. त्यामुळे पालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.

मागीलवर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले. परिणामी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यानंतर कालांतराने कोरोना लाट जशी कमी झाली, त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढतच चालल्याने शाळा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला गेला, तर शाळेसोबत खासगी क्लासेसवालेही ऑनलाईन शिकवण्या घेत असल्याने मुलांचा बहुतांश वेळ ऑनलाईन शिक्षणातच जाऊ लागला. परिणामी वर्षभरापासून मुले घरातच कोंडली गेलेली आहेत.

मुक्तपणे मैदानावर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल व टीव्हीव्यतिरिक्त मनोरंजनासाठी दुसरे साधन शिल्लक नाही. घराबाहेर पडण्यासाठी पालकांचा मज्जाव आहे. एकाच ठिकाणी बसून मुले कंटाळली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. पालकांनाही आपल्या मुलांची चिंता सतावत आहे. आपल्या मुलांचा तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत गप्पा, गोष्टी कराव्यात. तसेच छोटे-मोठे खेळ खेळावेत, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

शारीरिक आरोग्यावर परिणामांची भीती

कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले. मुलांना घरीच रहावे लागत आहे. टीव्ही व मोबाईलवरच वेळ घालविणे सुरू आहे. मित्र, सवंगडी भेटत नसल्याने मुलांचे मैदानी खेळ खेळणेच बंद झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी मुलांची मानसिकता समजून त्यांना वेळ द्यावा - डॉ.प्रसाद कुलकर्णी,

बाल रोगतज्ज्ञ, अंबाजोगाई.