शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात पिकेही जोमदार आली होती. परंतु अतिपावसामुळेही काढणीला आलेली पिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात पिकेही जोमदार आली होती. परंतु अतिपावसामुळेही काढणीला आलेली पिक आता पाण्यात आहेत. त्यामुळे निसर्गाने दिलेले, त्यानेच हिरावलं असेच म्हणावे लागेल. आता सरकारनेच शेतकऱ्यांसाठी धावून येण्याची गरज आहे. सोमवारी (दि.२०) पासून सुरू झालेल्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान झाले आहे.

यंदा ५० हजारांपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. पाऊसही वेळेवर झाल्याने पेरणीची वेळेवरच झाली. पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार पाऊस होत गेला. मध्यंतरी पंधरा दिवस पावसाने ओढ दिल्याने हलक्या जमिनीवरील पिकांना फटका बसला, मात्र सुपीक जमिनीवरची पीक, जोमात होती. या महिन्यात गरजेपेक्षा जास्त पाऊस होत गेल्याने चांगल्या पिकांचेही नुकसान होत गेले. मोठे पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व तलाव व साठवण तलाव तुडुंब भरले. त्यानंतर पिकांना पाणी लागण्यास सुरुवात झाली. पुन्हा चार दिवस पावसाची उघडीप झाल्याने, शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू केली. मजुरांची जुळवा, जुळव करून गुत्ते पद्धतीने काढणीचा ठरावही केले. आता दोन दिवसांत सोयाबीन काढायचे म्हटले तर, पुन्हा सोमवारपासून पावसाची रिमझिम सुरू झाली आणि होते नव्हते ते पीकही पाण्यात गेले.

आता हा पाऊस कधी थांबणार आणि पिकातील पाणी कधी निघणार अशी अवस्था झाली आहे. तालुक्यातील पूस परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात आहे. येल्डा परिसरातील काही, शेतकऱ्यांनी हाती लागेल तेवढे चिखलातच सोयाबीन काढणी सुरू केली आहे. हे भिजलेले सोयाबीन वाळवायचे कसे? आता त्याला मोड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

...

भावही कोसळले

आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन येऊ लागले की, त्याचे भाव अर्ध्यावर खाली आले. एकीकडून निसर्गाने हिरावले, तर दुसरीकडे बाजारातही भाव पडले. तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायचे? असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीने शेतकरी कर्जाच्या बोजातून कसा बाहेर येईल हाच प्रश्न आहे. हे आता सरकार भरोसेच आहे.

240921\img-20210924-wa0066.jpg

अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाची अवस्था.