शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात पिकेही जोमदार आली होती. परंतु अतिपावसामुळेही काढणीला आलेली पिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात पिकेही जोमदार आली होती. परंतु अतिपावसामुळेही काढणीला आलेली पिक आता पाण्यात आहेत. त्यामुळे निसर्गाने दिलेले, त्यानेच हिरावलं असेच म्हणावे लागेल. आता सरकारनेच शेतकऱ्यांसाठी धावून येण्याची गरज आहे. सोमवारी (दि.२०) पासून सुरू झालेल्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान झाले आहे.

यंदा ५० हजारांपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. पाऊसही वेळेवर झाल्याने पेरणीची वेळेवरच झाली. पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार पाऊस होत गेला. मध्यंतरी पंधरा दिवस पावसाने ओढ दिल्याने हलक्या जमिनीवरील पिकांना फटका बसला, मात्र सुपीक जमिनीवरची पीक, जोमात होती. या महिन्यात गरजेपेक्षा जास्त पाऊस होत गेल्याने चांगल्या पिकांचेही नुकसान होत गेले. मोठे पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व तलाव व साठवण तलाव तुडुंब भरले. त्यानंतर पिकांना पाणी लागण्यास सुरुवात झाली. पुन्हा चार दिवस पावसाची उघडीप झाल्याने, शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू केली. मजुरांची जुळवा, जुळव करून गुत्ते पद्धतीने काढणीचा ठरावही केले. आता दोन दिवसांत सोयाबीन काढायचे म्हटले तर, पुन्हा सोमवारपासून पावसाची रिमझिम सुरू झाली आणि होते नव्हते ते पीकही पाण्यात गेले.

आता हा पाऊस कधी थांबणार आणि पिकातील पाणी कधी निघणार अशी अवस्था झाली आहे. तालुक्यातील पूस परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात आहे. येल्डा परिसरातील काही, शेतकऱ्यांनी हाती लागेल तेवढे चिखलातच सोयाबीन काढणी सुरू केली आहे. हे भिजलेले सोयाबीन वाळवायचे कसे? आता त्याला मोड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

...

भावही कोसळले

आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन येऊ लागले की, त्याचे भाव अर्ध्यावर खाली आले. एकीकडून निसर्गाने हिरावले, तर दुसरीकडे बाजारातही भाव पडले. तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायचे? असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीने शेतकरी कर्जाच्या बोजातून कसा बाहेर येईल हाच प्रश्न आहे. हे आता सरकार भरोसेच आहे.

240921\img-20210924-wa0066.jpg

अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाची अवस्था.