शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

शिवसंग्रामच्या वतीने बीड पालिकेवर हंडा बजाओ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST

बीड : शिवसंग्रामच्या वतीने बीड शहरवासीयांच्या प्रश्नावर बीड पालिकेवर २८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हंडा बजाओ मोर्चा काढण्यात ...

बीड : शिवसंग्रामच्या वतीने बीड शहरवासीयांच्या प्रश्नावर बीड पालिकेवर २८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हंडा बजाओ मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांनी सांगितले.

मेटे म्हणाले की, बीड नगरपालिका मागील ३५ वर्षापासून क्षीरसागरांच्या ताब्यात आहे. एवढ्या वर्षांमध्ये बीड शहराचा विकासात्मक चेहरा-मोहरा बदलण्याचे काम त्यांनी करणे आवश्यक होते. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर निधी विकासाच्या नावाखाली बीड शहरासाठी येतो परंतु विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे कुरण करून बीड शहराचा विकास करण्याऐवजी बीड शहराला भकास करण्याचे काम सर्वच क्षीरसागरांनी मिळून केलेले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, भूमिगत गटार योजनेसाठी, स्वच्छता, घरकुलांसाठी शेकडो कोटीच्या योजना आलेल्या आहेत. परंतु क्षीरसागरांच्या घरातील भांडणामुळे आणि गैरव्यवहारामुळे सदरील कामे वर्षानुवर्षे रखडलेले पहायला मिळतात. त्याचा त्रास बीडवासीयांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. बीड शहराला अभिमान वाटावा, अशा पद्धतीचे काम या सर्व क्षीरसागरांनी मिळून काहीही केलेले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बीडवासीयांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शिवसंग्रामने वेळोवेळी आ.विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडवासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे आणि यापुढेही करत राहू, म्हणून शिवसंग्रामने रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे म्हणून आंदोलन केले, उपोषणे केलीत, स्वच्छता मोहीम हातामध्ये घेतल्या, गटारी साफ केल्या, नदी साफ केली. असे कार्यक्रम सातत्याने शिवसंग्राम राबवत आहे. आज सुद्धा मुबलक पाणी असताना पण बीडवासीयांना कुठे १५ दिवसांनी तर कुठे १० दिवसांनी नगरपालिकेकडून पाणी मिळत आहे. पाणी प्रश्नाबरोबरच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर शिवसंग्रामने येत्या २८ डिसेंबर २० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगरपालिकेवर हंडा बजाओ मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये सर्व बीडवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांनी केले आहे