शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

बीडमध्ये पालिकेचा बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:21 IST

अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

बीड शहरात गल्लीबोळांसह मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले. याचा परिणाम वाहतुकीवर होत होता. अतिक्रमणातून मार्ग काढताना सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. या अतिक्रमणधारकांना पालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आल्या.

परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमणधारक स्वत:हून अतिक्रमणे काढत नसल्याचे दिसताच पालिकेने गुरुवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहीम होती घेतली. साठे चौकापासून मोहिमेला सुरुवात झाली. बसस्थानक परिसरात रस्त्यांवर लागलेल्या हातगाड्यांसह छोट्या मोठ्या टपºयांवर हातोडा फिरवण्यात आला. नगर परिषद मार्गे भाजीमंडईत मोहीम पोहचली. येथे काही वेळ भिंत पाडण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. पालिकेने नियमांवर बोट ठेवून भाजीमंडईतील सर्व अतिक्रमणे हटविली.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, विद्युतचे अभियंता मुंडे, ट्रेसर सय्यद लईक, स्वच्छता निरीक्षक व्ही. टी. तिडके, भागवत जाधव, आर. एस. जोगदंड, सुनील काळकुटे, भारत चांदणे, ज्योती ढाका यांच्यासह शेकडो पालिका, पोलीस कर्मचाºयांसह आरसीपीचे जवान बंदोबस्तावर होता.

कारवाईत सातत्य महत्त्वाचेयापूर्वीचे अनुभव पाहता पुढे अतिक्रमण हटविले की मागे जैसे थे परिस्थिती दिसून येते. कारवाईत सातत्य राहिले तर अतिक्रमण करण्यास कोणीही पुढे येणार नाही. जे पुढे येतील त्यांच्यावर कठोर कारवाईची गरज आहे. या कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कारवाईत पुजा-याने आणला अडथळापालिकेकडून नियमाप्रमाणे अतिक्रमण हटविणे सुरु असताना बशीरगंज चौकातील अतिक्रमित भिंत पाडताना येथील एका पुजा-याने अडथळा आणला. स्वत:च्या डोक्यात दगड मारुन घेत त्याने संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मुख्याधिकारी डॉ. जावळीकर, उप अधीक्षक खिरडकर, सुलेमान यांनी प्रकरण गांभीर्याने हाताळले. कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर या पुजाºयाला रुग्णालयात दाखल करुन अतिक्रमण हटाव मोहीम पुढे सरकली.कारवाईत दुजाभाव नाहीअतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य ठेवले जाईल. या कारवाईत दुजाभाव झालेला नाही. कोणाचीही गय केलेली नाही. नागरिकांनी अतिक्रमणे काढून पालिकेला सहकार्य करावे. नसता कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल.- डॉ. धनंजय जावळीकरमुख्याधिकारी, न.प.रस्त्यांनी घेतला मोकळा श्वासअतिक्रमणे हटविल्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होईल. याउपरही वाहनधारकांनी वाहने रस्त्यावर उभी केल्यास त्यावर कारवाई केली जाईल. पालिकेच्या मदतीने वाहने जप्तही केली जातील.- सुधीर खिरडकरपोलीस उप अधीक्षक