शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

बीडमध्ये पालिकेचा बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:21 IST

अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

बीड शहरात गल्लीबोळांसह मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले. याचा परिणाम वाहतुकीवर होत होता. अतिक्रमणातून मार्ग काढताना सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. या अतिक्रमणधारकांना पालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आल्या.

परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमणधारक स्वत:हून अतिक्रमणे काढत नसल्याचे दिसताच पालिकेने गुरुवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहीम होती घेतली. साठे चौकापासून मोहिमेला सुरुवात झाली. बसस्थानक परिसरात रस्त्यांवर लागलेल्या हातगाड्यांसह छोट्या मोठ्या टपºयांवर हातोडा फिरवण्यात आला. नगर परिषद मार्गे भाजीमंडईत मोहीम पोहचली. येथे काही वेळ भिंत पाडण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. पालिकेने नियमांवर बोट ठेवून भाजीमंडईतील सर्व अतिक्रमणे हटविली.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, विद्युतचे अभियंता मुंडे, ट्रेसर सय्यद लईक, स्वच्छता निरीक्षक व्ही. टी. तिडके, भागवत जाधव, आर. एस. जोगदंड, सुनील काळकुटे, भारत चांदणे, ज्योती ढाका यांच्यासह शेकडो पालिका, पोलीस कर्मचाºयांसह आरसीपीचे जवान बंदोबस्तावर होता.

कारवाईत सातत्य महत्त्वाचेयापूर्वीचे अनुभव पाहता पुढे अतिक्रमण हटविले की मागे जैसे थे परिस्थिती दिसून येते. कारवाईत सातत्य राहिले तर अतिक्रमण करण्यास कोणीही पुढे येणार नाही. जे पुढे येतील त्यांच्यावर कठोर कारवाईची गरज आहे. या कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कारवाईत पुजा-याने आणला अडथळापालिकेकडून नियमाप्रमाणे अतिक्रमण हटविणे सुरु असताना बशीरगंज चौकातील अतिक्रमित भिंत पाडताना येथील एका पुजा-याने अडथळा आणला. स्वत:च्या डोक्यात दगड मारुन घेत त्याने संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मुख्याधिकारी डॉ. जावळीकर, उप अधीक्षक खिरडकर, सुलेमान यांनी प्रकरण गांभीर्याने हाताळले. कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर या पुजाºयाला रुग्णालयात दाखल करुन अतिक्रमण हटाव मोहीम पुढे सरकली.कारवाईत दुजाभाव नाहीअतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य ठेवले जाईल. या कारवाईत दुजाभाव झालेला नाही. कोणाचीही गय केलेली नाही. नागरिकांनी अतिक्रमणे काढून पालिकेला सहकार्य करावे. नसता कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल.- डॉ. धनंजय जावळीकरमुख्याधिकारी, न.प.रस्त्यांनी घेतला मोकळा श्वासअतिक्रमणे हटविल्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होईल. याउपरही वाहनधारकांनी वाहने रस्त्यावर उभी केल्यास त्यावर कारवाई केली जाईल. पालिकेच्या मदतीने वाहने जप्तही केली जातील.- सुधीर खिरडकरपोलीस उप अधीक्षक