शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विरोधकांना माझेच म्हणायची सवय, आम्ही खोटे दावे करत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

आष्टी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आष्टी मतदारसंघात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या समर्थकांना कौल ...

आष्टी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आष्टी मतदारसंघात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या समर्थकांना कौल दिला आहे; परंतु काही विरोधक खोटे बोल, पण रेटून बोल याप्रमाणे दिशाभूल करणारे आकडे सांगताहेत. मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आल्या असल्याचे दर्शवित आहेत. विरोधकांचे हे दावे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. आष्टी मतदारसंघात विरोधकांना काहीही दिसले की माझेच व मीच केले असे म्हणायची सवय असल्याची टीका आ.बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत नाव न घेता आ. सुरेश धस त्यांच्यावर केली.

आ. आजबे म्हणाले, काल आणि आज आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणास भेटण्यासाठी आले होते. यातील बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे आहेत, तर काही महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मानणारे आहेत, त्यामुळे सहाजिकच मतदारसंघात भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जास्त संख्येने निवडून आले आहेत. विरोधक मात्र खोटे बोलत आहेत, त्यांचे आकडे हे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. खोटे बोल, पण रेटून बोल असे विरोधक वागत आहेत. शहरी व ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीबाबत जनतेमध्ये नकारात्मक भूमिका तयार झाली आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनताही महाविकास आघाडीच्या बाजूने उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुतांश ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणाकडे आले असता आपण सर्वांचे फेटे बांधून सत्कार केले. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटे दावे केले तरी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, व काँग्रेस या महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला असल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.