शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

विरोधकांना माझेच म्हणायची सवय, आम्ही खोटे दावे करत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

आष्टी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आष्टी मतदारसंघात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या समर्थकांना कौल ...

आष्टी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आष्टी मतदारसंघात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या समर्थकांना कौल दिला आहे; परंतु काही विरोधक खोटे बोल, पण रेटून बोल याप्रमाणे दिशाभूल करणारे आकडे सांगताहेत. मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आल्या असल्याचे दर्शवित आहेत. विरोधकांचे हे दावे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. आष्टी मतदारसंघात विरोधकांना काहीही दिसले की माझेच व मीच केले असे म्हणायची सवय असल्याची टीका आ.बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत नाव न घेता आ. सुरेश धस त्यांच्यावर केली.

आ. आजबे म्हणाले, काल आणि आज आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणास भेटण्यासाठी आले होते. यातील बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे आहेत, तर काही महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मानणारे आहेत, त्यामुळे सहाजिकच मतदारसंघात भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जास्त संख्येने निवडून आले आहेत. विरोधक मात्र खोटे बोलत आहेत, त्यांचे आकडे हे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. खोटे बोल, पण रेटून बोल असे विरोधक वागत आहेत. शहरी व ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीबाबत जनतेमध्ये नकारात्मक भूमिका तयार झाली आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनताही महाविकास आघाडीच्या बाजूने उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुतांश ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणाकडे आले असता आपण सर्वांचे फेटे बांधून सत्कार केले. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटे दावे केले तरी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, व काँग्रेस या महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला असल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.