शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

गावोगावी कृषी विभागाकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST

विविध बांधकाम वाळू अभावी ठप्प वडवणी : कोरोनाच्या संसर्ग पाठोपाठ प्रशासकीय उदासीनतेमुळे शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुलांची कामे ...

विविध बांधकाम वाळू अभावी ठप्प

वडवणी : कोरोनाच्या संसर्ग पाठोपाठ प्रशासकीय उदासीनतेमुळे शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुलांची कामे ठप्प आहेत. वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरातील विविध योजनेचे घरकूल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे घरकूल बांधकाम करताना वाळूची समस्या निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना बांधकाम बंद ठेवावी लागली. घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

डिझेल दरवाढीचा शेती मशागतीला फटका

वडवणी : दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत असल्याने मशागतीची कामे करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रतिलिटर डिझेलचे दर ९३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे मशागतीचे दरही पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत. पारंपरिक शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. शेती मशागतीसाठी सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पावसाळ्यापूर्वी मशागतीला सुरूवात झाली आहे.

ना मास्क,ना सोशल डिस्टन्स

वडवणी : शहरासह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने नागरिकांच्या मनात भीती राहिली नाही. दोन दिवसापासून शहरातील बाजारपेठेत नागरिकांची बिनधास्त वर्दळ पाहावयास मिळत आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानात ना सोशल डिस्टन्स, ना मास्क,असे चित्र सध्या आहे. लोकांनी कोरोना नियम पाळणे आवश्यक आहे,अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात. दुकानदारांनी येणाऱ्या ग्राहकांना कोविड नियमावलीनुसार प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी

वडवणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅकडाऊन जाहीर केला असल्याने जनावरांचे बाजार बंद असल्याने थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. खरीप हंगामातील पेरण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. मशागतीस बैल जोडी आवश्यकता असते. सध्या डिझेल दरवाढीचा शेती मशागतीस फटका बसत असल्याने बैलांच्या साह्याने मशागतीस पसंती दिली जात आहे. जनावरांचे बाजार अनेक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बैल, गाय, म्हैस, शेळ्या खरेदी-विक्रीसाठी अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून जनावरांचे बाजार सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.