शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा, काय काळजी घ्यायची, कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना सांगितल्या जात आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप घोणशीकर यांनी दिली.

फळांना मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बाजारपेठेत गेल्या आठवडाभरापासून फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या बाजारात द्राक्षे, पपई, अननस, टरबूज, खरबूज, सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, चिक्कू, नारळपाणी या फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. द्राक्ष ६० रुपये तर खरबूज ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. वाढत्या उष्णतेने थंडावा मिळावा म्हणून ग्राहकांकडूनही फळांची मागणी वाढली असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.

पाण्याचा अपव्यय

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नागरिक आपले पाणी भरून झाल्यानंतर आपला नळ बंद न ठेवता ते पाणी वाहून जाते. परिणामी, पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. नागरिकांनी पाणीबचतीचे महत्त्व समजून घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा.

बंदचा रिक्षा व्यवसायाला फटका

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या कालावधीत बससेवा बंद राहिली. याचा परिणाम म्हणून रिक्षाचालकांना बेरोजगार व्हावे लागले. सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीतच सर्व व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसायही होत नाही. तर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकही रिक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

वृद्ध कलावंतांना मानधन द्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात वृद्ध कलावंतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वृद्ध कलावंतांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मानधन सुरू करण्यात आले आहे. ज्यांना ही योजना लागू आहे, अशा कलावंतांचे माानधन अनेक महिन्यांपासून रखडले आहे. तर, ज्या नवीन कलावंतांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत, त्यांच्या प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. अशा कलावंतांना तत्काळ मानधन सुरू करा, अशी मागणी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ कलावंत उल्हास पांडे यांनी केली आहे.