शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

ग्रामपंचायतींकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा, काय काळजी घ्यायची, कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना सांगितल्या जात आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप घोणशीकर यांनी दिली.

फळांना मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बाजारपेठेत गेल्या आठवडाभरापासून फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या बाजारात द्राक्षे, पपई, अननस, टरबूज, खरबूज, सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, चिक्कू, नारळपाणी या फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. द्राक्ष ६० रुपये तर खरबूज ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. वाढत्या उष्णतेने थंडावा मिळावा म्हणून ग्राहकांकडूनही फळांची मागणी वाढली असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.

पाण्याचा अपव्यय

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नागरिक आपले पाणी भरून झाल्यानंतर आपला नळ बंद न ठेवता ते पाणी वाहून जाते. परिणामी, पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. नागरिकांनी पाणीबचतीचे महत्त्व समजून घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा.

बंदचा रिक्षा व्यवसायाला फटका

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या कालावधीत बससेवा बंद राहिली. याचा परिणाम म्हणून रिक्षाचालकांना बेरोजगार व्हावे लागले. सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीतच सर्व व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसायही होत नाही. तर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकही रिक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

वृद्ध कलावंतांना मानधन द्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात वृद्ध कलावंतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वृद्ध कलावंतांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मानधन सुरू करण्यात आले आहे. ज्यांना ही योजना लागू आहे, अशा कलावंतांचे माानधन अनेक महिन्यांपासून रखडले आहे. तर, ज्या नवीन कलावंतांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत, त्यांच्या प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. अशा कलावंतांना तत्काळ मानधन सुरू करा, अशी मागणी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ कलावंत उल्हास पांडे यांनी केली आहे.