शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

ग्रामपंचायतींकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा, काय काळजी घ्यायची, कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना सांगितल्या जात आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप घोणशीकर यांनी दिली.

फळांना मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बाजारपेठेत गेल्या आठवडाभरापासून फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या बाजारात द्राक्षे, पपई, अननस, टरबूज, खरबूज, सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, चिक्कू, नारळपाणी या फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. द्राक्ष ६० रुपये तर खरबूज ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. वाढत्या उष्णतेने थंडावा मिळावा म्हणून ग्राहकांकडूनही फळांची मागणी वाढली असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.

पाण्याचा अपव्यय

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नागरिक आपले पाणी भरून झाल्यानंतर आपला नळ बंद न ठेवता ते पाणी वाहून जाते. परिणामी, पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. नागरिकांनी पाणीबचतीचे महत्त्व समजून घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा.

बंदचा रिक्षा व्यवसायाला फटका

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या कालावधीत बससेवा बंद राहिली. याचा परिणाम म्हणून रिक्षाचालकांना बेरोजगार व्हावे लागले. सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीतच सर्व व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसायही होत नाही. तर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकही रिक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

वृद्ध कलावंतांना मानधन द्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात वृद्ध कलावंतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वृद्ध कलावंतांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मानधन सुरू करण्यात आले आहे. ज्यांना ही योजना लागू आहे, अशा कलावंतांचे माानधन अनेक महिन्यांपासून रखडले आहे. तर, ज्या नवीन कलावंतांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत, त्यांच्या प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. अशा कलावंतांना तत्काळ मानधन सुरू करा, अशी मागणी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ कलावंत उल्हास पांडे यांनी केली आहे.