गोविंद इंगळे यांनी २०१४ मध्ये आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली आहेत. त्यांच्या पत्नी दैवशाला यांना दीड एकर जमीन असून राहण्यासाठी पत्र्याचे कुड असूनही मोठ्या हिंमतीने काबाडकष्ट करून चारही मुलींचे संगोपन करू लागल्या.
दरम्यानच्या काळात इंगळे कुटुंबाची माहिती शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करत असलेल्या ‘आधार माणुसकीचा’ उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांना समजल्यावर त्यांनी या कुटुंबातील चारही मुलींच्या शिक्षण-आरोग्य-विवाहाबाबतची जवाबदारी स्वीकारून, वेळोवेळी या कुटुंबास सहकार्य करत आहेत.
इंगळे कुटुंबातील मोठी मुलगी शीतल हिचा विवाह जमल्याची माहिती दैवशाला यांनी ॲड. संतोष पवार यांना कळविली असता पवार यांनी पालकमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक खंडू गोरे यांची भेट घेऊन इंगळे कुटुंबातील मुलीच्या विवाहसाठी मदत करण्याची विनंती केली. २४ मे रविवार रोजी विवाहप्रसंगी वाल्मिक कऱ्हाड यांनी प्रतिनिधीमार्फत वीस हजार रुपयांची मदत इंगळे कुटुंबास देण्यात आली. विवाह प्रसंगी धनंजय मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
या विवाहासाठी सराफा व्यापारी अश्रूबा टाक यांनी वधूसाठी चांदीचे दागिने,तर भारज येथील वेंकटराव शिंदे यांनी वधू-आई यांच्यासाठी कपड्याचा आहेर दिला.
याप्रसंगी मुरकुटवाडीचे सरपंच बबनराव मुंडे,दरड वाडीचे सरपंच सज्जन दराडे,माजी सरपंच अशोक इंगळे, शिवहार भताने,बालासाहेब कातकडे,आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार, किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव उपस्थित होते.
===Photopath===
250521\img-20210524-wa0105_14.jpg