शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:35 IST

..तर आंदोलन अटळ : शिवसंग्रामचे इशारा निवेदन बीड : मराठा समाजाला अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर मिळालेले आरक्षण ...

..तर आंदोलन अटळ : शिवसंग्रामचे इशारा निवेदन

बीड : मराठा समाजाला अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २१ रोजी रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा, या मागणीकरिता शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय यांना इशारा निवेदन देण्याचे आदेशित करण्यात आले याचाच एक भाग म्हणून बीड तहसीलदार यांना शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान शासनाने व मराठा समाजाचे विषय हाताळणारे अशोकराव चव्हाण यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. व्यवस्थित नियोजन केले नाही. सर्वांना विश्वासात घेतले नाही, म्हणून एकूणच सरकार व चव्हाण यांनी मराठा आरक्षण गांभिर्याने घेतले नाही म्हणूनच मराठा आरक्षण रद्द झाले आहे . मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झालेला आहे . समाजाचे आणि पुढील पिढीचे भविष्य या मुळे उध्वस्त झाले आहे . याचे सोयरसुतक श्री.चव्हाण व सरकारला अजिबात नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर शासनाने व मुख्यमंत्री या नात्याने मराठा समाजाला घेवुन न्याय दयावा . शासनाने त्वरित निर्णय घ्यावेत व मराठा समाजाला दिलासा द्यावा, या करीता शिवसंग्राम बीडच्या वतीने हे “इशारा निवेदन” देण्यात आले. लवकर निर्णय घेतला नाही तर समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आंदोलनाची सुरूवात आम्ही बीडपासून ५ जुन २१ रोजी आमच्या अधिकारासाठी मोर्चा काढून करणार आहोत, असे निवेदनात म्हंटले आहेत. यावेळी रामहरी मेटे, आनंद जाधव, मनोज जाधव, ज्ञानेश्वर कोकाटे, दत्ता गायकवाड, विनोद कवडे, नितीन आगवन, शरद पवार, कदम एस. बी., अजय आगवान, पंडित शेंडगे, आदी उपस्थित होते.

===Photopath===

180521\230618_2_bed_30_18052021_14.jpeg

===Caption===

निवेदन