शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:35 IST

..तर आंदोलन अटळ : शिवसंग्रामचे इशारा निवेदन बीड : मराठा समाजाला अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर मिळालेले आरक्षण ...

..तर आंदोलन अटळ : शिवसंग्रामचे इशारा निवेदन

बीड : मराठा समाजाला अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २१ रोजी रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा, या मागणीकरिता शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय यांना इशारा निवेदन देण्याचे आदेशित करण्यात आले याचाच एक भाग म्हणून बीड तहसीलदार यांना शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान शासनाने व मराठा समाजाचे विषय हाताळणारे अशोकराव चव्हाण यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. व्यवस्थित नियोजन केले नाही. सर्वांना विश्वासात घेतले नाही, म्हणून एकूणच सरकार व चव्हाण यांनी मराठा आरक्षण गांभिर्याने घेतले नाही म्हणूनच मराठा आरक्षण रद्द झाले आहे . मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झालेला आहे . समाजाचे आणि पुढील पिढीचे भविष्य या मुळे उध्वस्त झाले आहे . याचे सोयरसुतक श्री.चव्हाण व सरकारला अजिबात नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर शासनाने व मुख्यमंत्री या नात्याने मराठा समाजाला घेवुन न्याय दयावा . शासनाने त्वरित निर्णय घ्यावेत व मराठा समाजाला दिलासा द्यावा, या करीता शिवसंग्राम बीडच्या वतीने हे “इशारा निवेदन” देण्यात आले. लवकर निर्णय घेतला नाही तर समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आंदोलनाची सुरूवात आम्ही बीडपासून ५ जुन २१ रोजी आमच्या अधिकारासाठी मोर्चा काढून करणार आहोत, असे निवेदनात म्हंटले आहेत. यावेळी रामहरी मेटे, आनंद जाधव, मनोज जाधव, ज्ञानेश्वर कोकाटे, दत्ता गायकवाड, विनोद कवडे, नितीन आगवन, शरद पवार, कदम एस. बी., अजय आगवान, पंडित शेंडगे, आदी उपस्थित होते.

===Photopath===

180521\230618_2_bed_30_18052021_14.jpeg

===Caption===

निवेदन