शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

बीड : हॉटेल, हातगाड्यांवर खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात आहे. याच्यावर आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून ‘रूको’ (री ...

बीड : हॉटेल, हातगाड्यांवर खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात आहे. याच्यावर आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून ‘रूको’ (री पर्पज युजड कुकिंग ऑईल) नावाची मोहीम राबविली जात आहे. यात आता गती दिली जाणार आहे. तेलाचा वारंवार वापर करणे, तर गुन्हा आहेच परंतु नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. या तेलामुळे कॅन्सर, पोटदुखीचे गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते.

जिल्ह्यात हॉटेल्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अपवादात्मक वगळता बहुतांश हॉटेलमध्ये सुविधा नसतात. स्वच्छतेचा अभाव असतो. तसेच पदार्थही पौष्टिक आहे की नाही, याबाबत शंका असते. अशातच काही हॉटेलमध्ये खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पोटदुखी, पोटात भडभड करणे यासारखा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यावर तेलाचा वापर पुन्हा पुन्हा होतो का, याचीही खात्री करण्याची गरज आहे. अन्यथा, पैसे देऊन आपल्याच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

--

नियम काय आहे...

खाद्यतेल वारंवार वापरल्यानंतर त्याची टीपीसी (टोटल पोलार कंपाऊन) ही २५ टक्के पेक्षा जास्त असायला नको. त्यापेक्षा जास्त झाल्यास तेल खराब झाल्याचे निष्पन्न होते.

--

तर सात वर्षांपर्यंत जेलमध्ये जाल...

खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्याचे तपासणीत सिद्ध झाल्यास हॉटेल चालकावर अन्न सुरक्षा मानदेअंतर्गत परवाना व नोंदणी नियम २०१७ अंतर्गत कारवाई होते. तसेच कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यात ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

--

आतापर्यंत एकही कारवाई नाही

रूको ही मोहीम मागील वर्षापासून सुरू आहे. दररोज ५० लिटरपेक्षा जास्त तेलाचा वापर असलेले एकही हॉटेल जिल्ह्यात नसल्याचा दावा अन्न प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोणत्याच हॉटेलची तपासणी अथवा कारवाई झालेली नाही. जर कोणी ५० लिटरपेक्षा जास्त तेल वापरत असेल तर अन्न प्रशासनाशी संपर्क करावा, खराब तेलाचीही योग्य पद्धतीने विक्री करून मोबदला घेता येऊ शकतो, असे सहायक आयुक्त इम्रान हाश्मी व अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी यांनी सांगितले.

---

खाद्यतेलाचा वारंवार वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आपल्याकडे जिल्ह्यात आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही. सध्या तरी आपल्याकडे टीपीसी काऊंटर मशीन नाही. मशीन येताच तपासणी करून कारवाया केल्या जातील. हॉटेलचालकांनीही संपर्क करून मार्गदर्शन घ्यावे. खराब तेलाचीही विल्हेवाट लावता येते.

इम्रान हाश्मी, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन

--

खाद्यतेलाचा वारंवार वापर झाल्यास पोटदुखी, पोट धडधड करणे असे आजार होऊ शकतात. वारंवार तेल वापरल्याने त्यातील चवही निघून जाते. पोटासह इतर आजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

डॉ. महादेव चिंचाेळे, वैद्यकीय अधीक्षक गेवराई