शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

नियम पाळा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

बीड : सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल - ३ निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधांमध्ये अत्यावश्यक तसेच इतर ...

बीड : सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल - ३ निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधांमध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरू असल्याने जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दैनंदिन प्राप्त होणाऱ्या अहवालावरून रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.

जिल्ह्यामध्ये १० जून रोजी १६८ रुग्ण, ११ रोजी १३० रुग्ण, १२ रोजी १८० रुग्ण, १३ रोजी १०८ रुग्ण, तर १५ रोजी १५४ कोविड रुग्ण आढळून आलेले आहेत. सद्यस्थितीत निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून 'कोविडयोग्य वर्तना'चे पालन होत नाही. ते बाजारपेठांमध्ये विनाकारण फिरत असल्याने, शासकीय कार्यालयांमध्ये समूहांमध्ये गर्दी करत असल्याने, आवश्यकता नसताना रस्त्यावर समूहांमध्ये उभे राहणे, मास्कचा वापर न करता बाहेर फिरणे इत्यादी कारणांमुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा व मास्कचा वापर कमी प्रमाणात करत असून यामुळे भविष्यात पुन:श्च कडक निर्बंधांची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, शहरांमधील बाजारपेठांमध्ये आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, सर्व आस्थापना धारकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर व मास्कचा वापर आवश्यक करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे, सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण समूहामध्ये वावर टाळावा, रेस्टॉरंट, हॉटेल्स ही केवळ पन्नास टक्के उपस्थितीमध्ये निर्देशित केलेल्या वेळेत चालू ठेवण्यात यावीत. अन्यथा संबंधित रेस्टॉरंट, हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

यापुढे रुग्णसंख्या वाढीचा आलेख वाढत राहिल्यास, नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल, तसेच कोविड-१९ विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर शासन नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येईल. वेळेत दुकाने उघडावीत तसेच संध्याकाळी पाचनंतर अत्यंत आवश्यकता असेल तरच (वैद्यकीय कारणास्तव) घराबाहेर बाहेर पडावे. संध्याकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी लागू आहे, याचे भान ठेवावे. रुग्णवाढीचा दर वाढल्यास शासन निर्देशांनुसार जिल्हा जर स्तर-३ मधून स्तर चारमध्ये गेल्यास, सर्व नागरिकांना पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.