शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

नियम पाळा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

बीड : सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल - ३ निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधांमध्ये अत्यावश्यक तसेच इतर ...

बीड : सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल - ३ निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधांमध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरू असल्याने जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दैनंदिन प्राप्त होणाऱ्या अहवालावरून रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.

जिल्ह्यामध्ये १० जून रोजी १६८ रुग्ण, ११ रोजी १३० रुग्ण, १२ रोजी १८० रुग्ण, १३ रोजी १०८ रुग्ण, तर १५ रोजी १५४ कोविड रुग्ण आढळून आलेले आहेत. सद्यस्थितीत निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून 'कोविडयोग्य वर्तना'चे पालन होत नाही. ते बाजारपेठांमध्ये विनाकारण फिरत असल्याने, शासकीय कार्यालयांमध्ये समूहांमध्ये गर्दी करत असल्याने, आवश्यकता नसताना रस्त्यावर समूहांमध्ये उभे राहणे, मास्कचा वापर न करता बाहेर फिरणे इत्यादी कारणांमुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा व मास्कचा वापर कमी प्रमाणात करत असून यामुळे भविष्यात पुन:श्च कडक निर्बंधांची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, शहरांमधील बाजारपेठांमध्ये आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, सर्व आस्थापना धारकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर व मास्कचा वापर आवश्यक करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे, सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण समूहामध्ये वावर टाळावा, रेस्टॉरंट, हॉटेल्स ही केवळ पन्नास टक्के उपस्थितीमध्ये निर्देशित केलेल्या वेळेत चालू ठेवण्यात यावीत. अन्यथा संबंधित रेस्टॉरंट, हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

यापुढे रुग्णसंख्या वाढीचा आलेख वाढत राहिल्यास, नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल, तसेच कोविड-१९ विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर शासन नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येईल. वेळेत दुकाने उघडावीत तसेच संध्याकाळी पाचनंतर अत्यंत आवश्यकता असेल तरच (वैद्यकीय कारणास्तव) घराबाहेर बाहेर पडावे. संध्याकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी लागू आहे, याचे भान ठेवावे. रुग्णवाढीचा दर वाढल्यास शासन निर्देशांनुसार जिल्हा जर स्तर-३ मधून स्तर चारमध्ये गेल्यास, सर्व नागरिकांना पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.