शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नियम पाळा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

बीड : सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल - ३ निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधांमध्ये अत्यावश्यक तसेच इतर ...

बीड : सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल - ३ निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधांमध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरू असल्याने जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दैनंदिन प्राप्त होणाऱ्या अहवालावरून रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.

जिल्ह्यामध्ये १० जून रोजी १६८ रुग्ण, ११ रोजी १३० रुग्ण, १२ रोजी १८० रुग्ण, १३ रोजी १०८ रुग्ण, तर १५ रोजी १५४ कोविड रुग्ण आढळून आलेले आहेत. सद्यस्थितीत निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून 'कोविडयोग्य वर्तना'चे पालन होत नाही. ते बाजारपेठांमध्ये विनाकारण फिरत असल्याने, शासकीय कार्यालयांमध्ये समूहांमध्ये गर्दी करत असल्याने, आवश्यकता नसताना रस्त्यावर समूहांमध्ये उभे राहणे, मास्कचा वापर न करता बाहेर फिरणे इत्यादी कारणांमुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा व मास्कचा वापर कमी प्रमाणात करत असून यामुळे भविष्यात पुन:श्च कडक निर्बंधांची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, शहरांमधील बाजारपेठांमध्ये आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, सर्व आस्थापना धारकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर व मास्कचा वापर आवश्यक करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे, सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण समूहामध्ये वावर टाळावा, रेस्टॉरंट, हॉटेल्स ही केवळ पन्नास टक्के उपस्थितीमध्ये निर्देशित केलेल्या वेळेत चालू ठेवण्यात यावीत. अन्यथा संबंधित रेस्टॉरंट, हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

यापुढे रुग्णसंख्या वाढीचा आलेख वाढत राहिल्यास, नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल, तसेच कोविड-१९ विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर शासन नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येईल. वेळेत दुकाने उघडावीत तसेच संध्याकाळी पाचनंतर अत्यंत आवश्यकता असेल तरच (वैद्यकीय कारणास्तव) घराबाहेर बाहेर पडावे. संध्याकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी लागू आहे, याचे भान ठेवावे. रुग्णवाढीचा दर वाढल्यास शासन निर्देशांनुसार जिल्हा जर स्तर-३ मधून स्तर चारमध्ये गेल्यास, सर्व नागरिकांना पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.