शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

मांजरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : गुरुवारी (दि.२३) झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. परिणामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : गुरुवारी (दि.२३) झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. परिणामी मांजरा धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याची आवक पाहता लवकरच धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे.

मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दशलक्ष घनमीटर आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी (दि.२२) सकाळी सहा दरवाजे सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. रात्री पाणीपातळी कमी झाल्याने चार दरवाजे बंद करून फक्त दोन दरवाजे चालू ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री ८ वाजता हे दोन दरवाजे देखील बंद करण्याचे नियोजन होते. मात्र, गुरुवारी दुपारपासूनच मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी तर पावसाने रौद्ररूप धारण केले. अतिवृष्टीमुळे धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे रात्री सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. परंतु, पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ होत असल्याने अखेर शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीला पूर येऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, धरणात अजूनही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दरवाज्यावरून पाणी वहात असल्याने लवकरच सर्व दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.

...

शेतीचे अतोनात नुकसान

दरम्यान, अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली जाऊन शेतीचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी असताना सध्या धरणात २२६.५ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाणी शेकडो एकर शेतात घुसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

...

बंधाऱ्याचे दरवाजे तुटले, पूल पाण्याखाली

दरम्यान, मांजरा धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रचंड वेगाने अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर-कानडी बोरगाव येथील बंधाऱ्याचे दरवाजे तुटल्याही माहिती सूत्रांनी दिली. तर, आवाड शिरपुरासहीत इतर अनेक लहान पूल पाण्याखाली गेले आहेत.

...

सतर्कता बाळगण्याच्या सूचना

मांजरा धरणातून पाणी नदीपात्रात सोडले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.

240921\1236-img-20210924-wa0019.jpg

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडल्याने नदीला पूर आला आहे.