शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

वीस दिवसात रोखले पाच बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST

शिरुर कासार : तालुक्यात मे महिन्याच्या वीस दिवसांत एकूण पाच बालविवाह रोखण्यात तालुका बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, ...

शिरुर कासार : तालुक्यात मे महिन्याच्या वीस दिवसांत एकूण पाच बालविवाह रोखण्यात तालुका बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे, अशी माहिती तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांनी दिली आहे.

सध्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाभरात लॉकडाऊन व जमावबंदीसह अनेक निर्बंध लावलेले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील लोक हे आपल्या अल्पवयीन मुलींच्या इच्छेविरुद्ध कोणालाही माहिती न होऊ देता गुपचूप विवाह लावून देत असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत.

शिरूर तालुक्यातील बडेवाडी येथील एका १७ वर्षीय मुलीचे व एका १५ वर्षीय मतिमंद मुलीचा विवाह हे त्यांच्या इच्छेविरुद्ध लावून देण्याची तयारी करण्यात आली होती, परंतु त्यातील एका मुलीने चाईल्ड लाईनच्या १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर व लेक लाडकी अभियानाकडे या बाबतीत माहिती दिल्याने ते रोखण्यात आले. त्याचबरोबर शिरापूर गात येथील १३ वर्षीय व कान्होबाचीवाडी येथील १२ वर्षीय दोन मुलींच्या होणाऱ्या बालविवाहाची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल संरक्षण समितीस व चाईल्ड लाईन यांना प्राप्त झाल्याने ते देखील बालविवाह हे १९ मे रोजी रोखले, कुटुंबातील सर्व सदस्य यांचे समुपदेशन करून व बालविवाहानंतरचे होणारे नुकसान आणि दुष्परिणाम याबाबत माहिती देऊन हे विवाह थांबवण्यात आले. संबंधित मुलींच्या पालकांनी देखील आम्ही मुलींचे १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करून देणार नाही, असे जबाब, हमीपत्र लिहून देत मुलींना पुढील शिक्षण देण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. सदरची कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम.हुंडेकर, तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी बाजीराव ढाकणे, स्वप्नील कोकाटे, चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक रामहरी जाधव, टीम मेंबर अश्विनी जगताप, तालुका बालसंरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण, बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाये, अंगणवाडी पर्यवेक्षिका करपे, ग्रामसेविका खेडकर, शिरापूरचे ग्रामसेवक, शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डाॅ.रामचंद्र पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक भागवत सानप, पो.कॉ. सोमनाथ जायभाये यांनी केली आहे. यावेळी बबनराव मोरे, अक्षय मोरे आदी उपस्थित होते.

....

मुलींना स्वत:च्या पायावर उभे करावे

पालकांनी आपल्या मुला-मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करून द्यावी. वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे विवाह करावेत. बालविवाह करून त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य व शैक्षणिक भविष्याचे नुकसान करु नये. अन्यथा मुला-मुलींनी चाईल्ड लाईनच्या १०९८ या मोफत क्रमांकावर तसेच बाल संरक्षण समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांनी केले आहे.