शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नदीपात्रातील टरबूज, खरबूजवाड्यांची जागा शेताने घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:35 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील सिंदफणा व गोदावरी नदीपात्रात २० वर्षांपूर्वी खरबूज व टरबूजवाड्यासह काकड्यांचेही उत्पादन घेतले जात ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील सिंदफणा व गोदावरी नदीपात्रात २० वर्षांपूर्वी खरबूज व टरबूजवाड्यासह काकड्यांचेही उत्पादन घेतले जात होते. कालांतराने या नदीपात्रात मोठे बंधारे झाले. त्यामुळे पात्रात बारमाही पाणी राहत असल्याने टरबूज, खरबूज व काकड्यांची लागवड बंद झाली. सध्या या टरबूजवाड्यांची जागा शेतीने घेतली आहे.

उन्हाळा चालू झाला की सर्वांना आंबट व थंड पदार्थ खावे वाटतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला द्राक्षांची मागणी असते. त्यानंतर कैऱ्या, आंबे बाजारात उपलब्ध असतात. त्याच दरम्यान टरबूज व खरबुजांची मागणी जोर धरते. २०-२२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात नदीपात्रात छान वेली दिसायच्या. त्यामुळे कडक उन्हातही वाळूत गार गार जाणवायचे. या ठिकाणी छोट्या-छोट्या कोप्या करून आपल्या कुटुंबासह राहणारे भोई समाजाचे लोक डिसेंबर - जानेवारीत नदीपात्रातील पाणी ओसरताच टरबूज, खरबूज व काकडीची लागवड करीत असत. एप्रिल - मे महिन्यांत कडक उन्हात या फळांना बाजारात चांगलीच मागणी असायची. फळे मोठे होताच हे लोक वेगवेगळ्या वाहनांनी आठवडी बाजारातही फळे विकत घ्यायचे. गोदावरी नदीपात्रातील फळ हे अत्यंत गोड व चवीला चांगले असायचे. यामुळे पाहता पाहता ही फळे बाजारात संपून जायची.

मागील १५-२० वर्षांत माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रावर मोठी बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे या नदीपात्रात बारमाही पाणी राहत असल्याने या पात्रात टरबूज, खरबूज व काकडी पीक घेणे बंद झाले.

यामुळे या भोईसमाजावर उपासमारीची वेळ येऊ लागली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज व खरबुजाची पिके घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीस शेतकऱ्यास भीती वाटत असे. परंतु, कालांतराने या फळाचे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व बाजारपेठ मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग या पिकाकडे वळला. हे पीक घेत असताना जवळपास ७० ते ७५ टक्के शेतकरी हे भोई समाजातील लोकांना आपल्या शेतात हे पीक घेण्यास सांगतात. दोघांना निम्मे निम्मे उत्पन्न मिळते. याद्वारे शेतकऱ्यांसह भोई समाजातील नागरिकांची याद्वारे चांगल्याप्रकारे उपजीविका होऊ लागली.

भरावा लागत असे महसूल कर

तालुक्यातील सिंदफना, कुंडलिका व गोदावरी पात्रात टरबूज, खरबूज व काकडीची लागवड काही वर्षांपूर्वी केली जात असे. यातील सर्वच उत्पन्न आम्हालाच मिळत असे व मिळणाऱ्या उत्पन्नातून फक्त कर तहसील कार्यालयात भरावा लागत होता, असे गुंज खुर्द येथील भोई समाजाचे लाला रावण कुलौवंत यांनी सांगितले.

-

आम्ही अनेक वर्षांपासून शेतात टरबूज व खरबुजाचे उत्पादन घेतो. आम्हाला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते.

--डॉ. सदाशिव सरवदे, शेतकरी

===Photopath===

200521\purusttam karva_img-20210520-wa0032_14.jpg~200521\purusttam karva_img-20210520-wa0033_14.jpg