शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST

पाणी टंचाईचे सावट बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. आष्टी तालुक्यातील अनेक गावात जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या ...

पाणी टंचाईचे सावट

बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. आष्टी तालुक्यातील अनेक गावात जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात सर्वांना पाण्याची आस लागली आहे.

...

बँका पूर्णवेळ सुरू ठेवण्याची मागणी

बीड: जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोना लॉकडाऊन असल्याने बँकांचे व्यवहार पूर्ण क्षमतेने होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात अर्थकारण ठप्प झाले आहे. तरी बँका पूर्ण क्षमतेने चालू कराव्यात, यात कोरोना नियम पाळण्याचे सक्तीचे करावे, अशी मागणी आहे.

...

खते, बियाणे मोफत वाटप करा

बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांंनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे मोफत वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

....

काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके

बीड : पावसाळा पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे. शेतकरी ही खरिपाच्या तयारीसाठी सज्ज झाला आहे. यंदा बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तरी व्यापाऱ्यांनी योग्य किमतीत शेतकऱ्यांना बियाणे द्यावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा तालुका कृषी विभागाने दिला आहे.

...

कपाशी, सोयाबीन बियाणे बाजारात

धानोरा : आष्टी तालुक्यात खरीप हंगाम जवळ आल्याने कपाशी, सोयाबीनचे विविध कंपन्यांचे बियाणे विक्रीसाठी बाजारात आले आहे. कंपन्यांनी नवीन वाण विकसित केले आहेत. सर्वच कंपन्या आपलेच वाण कसे योग्य आहे, असा दावा करीत आहेत. यामुळे शेतकरीही यंदा कपाशीचे कोणते वाण लावायचे या द्विधा स्थितीत आहेत.

....

कडा येथील पुलाची दुरुस्ती करा

आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल आता कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहे. या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

....

पीक विमा रक्कम देण्याची मागणी

बीड : बीड जिल्ह्याचा २०२०-२०२१ या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता. हा विमा मंजूर झाला आहे. परंतु अद्याप त्याचे वाटप विमा कंपन्यांनी केले नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी तातडीने विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी होत आहे.

....

विद्युत पंपांची चोरी वाढली

बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्युत पंपाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पंप चोरीला गेला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.