शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

शेतकऱ्यांच्या हाताला पीक लागणार नाही - सुनील केंद्रेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:10 IST

शेतक-यांनी काळजी करु नये या परिस्थितीत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल कंद्रेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देनुकसानीचा घेतला आढावा । शासनाला सर्व परिस्थितीची माहिती दिली, काळजी करू नये

बीड : पीक वाढीच्या वेळी पासाने उसंत दिल्यामुळे वाढ व्यवस्थित झाली नव्हती. आणि आता काढणीच्या वेळी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरासरी ९० ते ९५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला पिक लागणार नाही. परंतु शेतक-यांनी काळजी करु नये या परिस्थितीत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल कंद्रेकर यांनी केले आहे.शनिवारी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी गेवराई, माजलगाव, बीड तालुक्यातील गावांमध्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना केंद्रेकर म्हणाले, प्रत्येक गावांत जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. शेतकºयांनी अर्ज भरलेला असो किंवा नसो पंचनामा मात्र होणार आहे. शेतकºयांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. सर्व बाधित शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा केला जाणार आहे. एकत्रितरित्या सर्व अर्ज स्विकारून त्यामुळे प्रत्येकाने तालुक्याला येऊन अर्ज देण्याची गरज नाही. विमा कंपनीकडून जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार लाभ दिला जाणार आहे. तसेच एनडीआरएफ मधून देखील मदत मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसेच तीन दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, येत्या १५ दिवसात शेतकºयांना मदत मिळण्याची आशा असल्याचे केंद्रेकर म्हणाले.

टॅग्स :Beedबीडcommissionerआयुक्तAgriculture Sectorशेती क्षेत्र