शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी हैराण; जागरण करत पिकाला द्यावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST

यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाऊस चांगला झाल्याने जलस्त्रोत तुडूंब भरले. काही ठिकाणच्या नद्यांना अजूनही पाणी आहे. ...

यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाऊस चांगला झाल्याने जलस्त्रोत तुडूंब भरले. काही ठिकाणच्या नद्यांना अजूनही पाणी आहे. त्यामुळे रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, करडई, यांचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. तर पाण्याची मुबलकता वाढल्याने ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ही लागवड होऊन आता महिनाभरांचा कालावधी लोटला. सर्वच पिके आता जोमाने बहरू लागली आहेत. मात्र, अशा स्थितीत महावितरणचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होतो. हा वीजपुरवठा एक आठवडा रात्री तर एक आठवडा दिवसा अशा पद्धतीने वीज दिली जाते. ही वीज देत असतांना वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने विद्युत पंप चालत नाहीत. कमी दाबाने वीज पुरवठा उपलब्ध झाल्यानंतर अनेक विद्युत पंप जळून निकामी होतात.

अगोदरच विजेचा कालावधी कमी असतो. अशा स्थितीत वीज वाहिन्यांमध्ये बिघाड दुरूस्त करण्यासाठी तासन् तास वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे दिवसभरात जो वेळ वीज पुरवठ्यासाठी दिलेला असतो. त्यातील अनेक तास दुरूस्तीतच निघून जातात. परिणामी शेतकºयांना शेतीला पाणी देण्यासाठी कमी कालावधी मिळतो. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध केल्यानंतर अंधारात चाचपडत शेतकºयांना जागरण करत शेतीला पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी व सरपटणारे प्राणी यांचा धोका पत्करून शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यावे लागते. वन्य प्राण्यांमुळे व सरपटणाºया प्राण्यांमुळे अनेक अपघात आजपर्यंत घडलेले आहेत. तरीही महवितरण याची दखल घेत नाही. अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोहित्र अतिदाब आल्यामुळे निकामी होत आहेत. हे नादुरूस्त झालेले रोहित्र दुरूस्तीसाठी शेतकरी स्वखर्चाने तालुक्याच्या ठिकाणी नेतात. पंधरा पंधरा दिवस या रोहित्रांची दुरूस्ती होत नाही. दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणचे सिंचन रखडते. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील सिंचन धोक्यात आले आहे. या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता शासनाकडे रात्रीचा वीजपुरवठा बदलून दिवसा देण्यात यावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच निकामी रोहित्र लवकर दुरूस्त करण्यात येणार असल्याचे देशपांडे लोकमतशी बोलतांना म्हणाले.