शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी हैराण; जागरण करत पिकाला द्यावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST

यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाऊस चांगला झाल्याने जलस्त्रोत तुडूंब भरले. काही ठिकाणच्या नद्यांना अजूनही पाणी आहे. ...

यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाऊस चांगला झाल्याने जलस्त्रोत तुडूंब भरले. काही ठिकाणच्या नद्यांना अजूनही पाणी आहे. त्यामुळे रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, करडई, यांचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. तर पाण्याची मुबलकता वाढल्याने ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ही लागवड होऊन आता महिनाभरांचा कालावधी लोटला. सर्वच पिके आता जोमाने बहरू लागली आहेत. मात्र, अशा स्थितीत महावितरणचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होतो. हा वीजपुरवठा एक आठवडा रात्री तर एक आठवडा दिवसा अशा पद्धतीने वीज दिली जाते. ही वीज देत असतांना वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने विद्युत पंप चालत नाहीत. कमी दाबाने वीज पुरवठा उपलब्ध झाल्यानंतर अनेक विद्युत पंप जळून निकामी होतात.

अगोदरच विजेचा कालावधी कमी असतो. अशा स्थितीत वीज वाहिन्यांमध्ये बिघाड दुरूस्त करण्यासाठी तासन् तास वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे दिवसभरात जो वेळ वीज पुरवठ्यासाठी दिलेला असतो. त्यातील अनेक तास दुरूस्तीतच निघून जातात. परिणामी शेतकºयांना शेतीला पाणी देण्यासाठी कमी कालावधी मिळतो. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध केल्यानंतर अंधारात चाचपडत शेतकºयांना जागरण करत शेतीला पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी व सरपटणारे प्राणी यांचा धोका पत्करून शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यावे लागते. वन्य प्राण्यांमुळे व सरपटणाºया प्राण्यांमुळे अनेक अपघात आजपर्यंत घडलेले आहेत. तरीही महवितरण याची दखल घेत नाही. अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोहित्र अतिदाब आल्यामुळे निकामी होत आहेत. हे नादुरूस्त झालेले रोहित्र दुरूस्तीसाठी शेतकरी स्वखर्चाने तालुक्याच्या ठिकाणी नेतात. पंधरा पंधरा दिवस या रोहित्रांची दुरूस्ती होत नाही. दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणचे सिंचन रखडते. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील सिंचन धोक्यात आले आहे. या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता शासनाकडे रात्रीचा वीजपुरवठा बदलून दिवसा देण्यात यावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच निकामी रोहित्र लवकर दुरूस्त करण्यात येणार असल्याचे देशपांडे लोकमतशी बोलतांना म्हणाले.