शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या हलगर्जीपणामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST

बीड : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी जिल्हा ...

बीड : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी जिल्हा प्रशासनाकडून ३०६ कोटी ७५ लाखांची मागणी केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार जिल्हा प्रशासनाला मंजूर झाले आहेत. त्यापैकी ९९ टक्के निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकेत जमा केला आहे. मात्र, अद्याप बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे शासनाकडून मदत येऊनदेखील बँकेच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

बीड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख ५५ हजार ७१० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल होता. त्यानंतर फेरपंचनाम्यात केज, अंबाजोगाई व परळी तालुक्यातील नुकसान झालेले क्षेत्र वाढले होते. झालेल्या नुकसानभरपाईपोटी तात्काळ मदत करावी, अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने केली जात होती. त्याला प्रतिसाद देत शासनाकडून ३०६ कोटी ७५ लाख मदत जाहीर करण्यात आली. त्यापैकी पहिल्या टप्प्याची रक्कम प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यापैकी जवळपास ९९ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकेकडे वर्ग केली आहे. मात्र, बँकेकडे ही रक्कम जमा होऊन जवळपास दीड महिना होत आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शासनाकडून रक्कम मिळूनदेखील शेतकरी वंचित असल्याचे चित्र आहे. ही बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. संबंधित बँकेवर कारवाई करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करावी, अशी मागणी होत आहे.

मदतीसाठी एकूण निधी मागणी ३०६ कोटी ७५ लाख

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ६ लाख १४ हजार

प्राप्त झालेला निधी १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार

तात्काळ रक्कम जमा न झाल्यास आंदोलन

पहिल्या टप्प्यातील रक्कम ही प्रशासनाकडून बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे; परंतु संबंधित बँकेच्या हलगर्जीपणामुळे बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. पुढील १५ दिवसांत जर अनुदान जमा झाले नाही, तर जिल्हाभरात आंदोलन करू.

कुलदीप करपे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

बँकेला अहवाल सादर करण्यासाठी पाठविली दोन पत्रे

बँकेत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी पाठविला आहे. सर्व रक्कम जमा होऊन महिला उलटला आहे. संबंधित बँक अधिकाऱ्याला अहवाल सादर करण्यासाठी दोन पत्रे दिली आहेत. अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली जाईल.

संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड