शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

बँकेच्या हलगर्जीपणामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST

बीड : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी जिल्हा ...

बीड : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी जिल्हा प्रशासनाकडून ३०६ कोटी ७५ लाखांची मागणी केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार जिल्हा प्रशासनाला मंजूर झाले आहेत. त्यापैकी ९९ टक्के निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकेत जमा केला आहे. मात्र, अद्याप बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे शासनाकडून मदत येऊनदेखील बँकेच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

बीड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख ५५ हजार ७१० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल होता. त्यानंतर फेरपंचनाम्यात केज, अंबाजोगाई व परळी तालुक्यातील नुकसान झालेले क्षेत्र वाढले होते. झालेल्या नुकसानभरपाईपोटी तात्काळ मदत करावी, अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने केली जात होती. त्याला प्रतिसाद देत शासनाकडून ३०६ कोटी ७५ लाख मदत जाहीर करण्यात आली. त्यापैकी पहिल्या टप्प्याची रक्कम प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यापैकी जवळपास ९९ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकेकडे वर्ग केली आहे. मात्र, बँकेकडे ही रक्कम जमा होऊन जवळपास दीड महिना होत आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शासनाकडून रक्कम मिळूनदेखील शेतकरी वंचित असल्याचे चित्र आहे. ही बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. संबंधित बँकेवर कारवाई करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करावी, अशी मागणी होत आहे.

मदतीसाठी एकूण निधी मागणी ३०६ कोटी ७५ लाख

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ६ लाख १४ हजार

प्राप्त झालेला निधी १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार

तात्काळ रक्कम जमा न झाल्यास आंदोलन

पहिल्या टप्प्यातील रक्कम ही प्रशासनाकडून बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे; परंतु संबंधित बँकेच्या हलगर्जीपणामुळे बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. पुढील १५ दिवसांत जर अनुदान जमा झाले नाही, तर जिल्हाभरात आंदोलन करू.

कुलदीप करपे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

बँकेला अहवाल सादर करण्यासाठी पाठविली दोन पत्रे

बँकेत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी पाठविला आहे. सर्व रक्कम जमा होऊन महिला उलटला आहे. संबंधित बँक अधिकाऱ्याला अहवाल सादर करण्यासाठी दोन पत्रे दिली आहेत. अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली जाईल.

संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड