शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

शेतकरी नवरा नको गं बाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST

बीड : मागील दोन दशकांपासून मुला-मुलींच्या जन्मदरात असमतोल निर्माण झाल्याने जवळपास सर्वच समाजात मुलींची संख्या कमी दिसून येत आहे. ...

बीड : मागील दोन दशकांपासून मुला-मुलींच्या जन्मदरात असमतोल निर्माण झाल्याने जवळपास सर्वच समाजात मुलींची संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे व इतर कारणांमुळे उपवर मुला- मुलींच्या लग्नाची चिंता वाढतच आहे. शिक्षण, शहरीकरणाचे आकर्षण आणि भौतिक हव्यासामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्याने वरपक्ष हैराण झाल्याचे दिसून आले.

वरपक्षाकडून मुलगी घरचा सांभाळ नीट करील काय? याचा विचार होतानाच मुलाला शोभणारे स्थळ शोधले जाते, तर दुसरीकडे मुलगा डॉक्टर, इंजिनियर, चांगली नोकरी असणारा हवा, त्याचबरोबर शेती, प्राॅपर्टीबाबत अशी अपेक्षा वाढली आहे. सर्वच समाजात मुलींच्या लग्नापेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता वाढल्याचे वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून काम करणाऱ्या समाजसेवींनी सांगितले, तर ब्राह्मण समाजात पौरोहित्य करणारे वेदशास्त्र फसंपन्न मुलांना डावलले जात असल्याची खंत पद्माकर रत्नपारखी यांनी व्यक्त केली. ८० हजारांपर्यंत मिळकत असणाऱ्या वेदशास्त्र फसंपन्न पुरोहितांना पैसे देऊन त्यांच्या पाया पडतात, आदर ठेवतात, पण त्यांना मुली देण्याचे टाळले जाते, असे ते म्हणाले.

-------

मुलगा डॉक्टर, इंजिनियर आहे का? शेती आहे का?

मुलगा डॉक्टर, इंजिनियर, सरकारी नोकरी असेल तर उत्तम, घर, प्रॉपर्टी हवी. शक्यतो पुणे, औरंगाबाद शहरातील असावा, तेथे फ्लॅट अथवा घर असावे? एवढे असूनही शेती आहे का? अशी विचारणा केली जाते. लग्नानंतर मोठ्या शहरात स्वतंत्र राहण्याच्या हेतूने घरात आई-वडील नको, अशीही अट अप्रत्यक्षपणे असते. भविष्यात प्रसंग ओढवल्यास प्रॉपर्टीत हिस्सा राहावा, या हेतुने शेतीचीही चौकशी केली जाते.

-----------

मुलांच्या बाबतीत जास्त अपेक्षा न करता, अधिक सुखाच्या पाठीमागे न धावता मुलगा निर्व्यसनी, स्वबळावर कमवता, सुसंस्कृत असलातरी स्वीकारायला हवा. अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख सोयी चांगल्या असताना नाहक अपेक्षा वाढत चालल्याने लग्न ही समस्या होऊन बसली आहे. स्थळाबाबत आमचे मंडळ गरजूंना नि:शुल्क सेवा देते.

- पद्माकर रत्नपारखी, पाणिग्रहण वधू-वर सूचक मंडळ, शाखा बीड.

---------

मराठा समाजात ८० टक्के मुला-मुलींचे शिक्षण झालेले आहे. मुलाकडे प्रॉपर्टी असावी, अशी मुलींच्या आई-वडिलांची अपेक्षा आहे; मात्र शेतीकडे कल कमी आहे. दहावी, बारावी शिक्षण झालेल्या मुलींच्या पालकांचीदेखील मुलगा पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरातील, नोकरदार असावा, अशी अपेक्षा वाढली आहे. स्थळांबाबत आम्ही कोणतेही शुल्क घेत नाहीत.

- अशोक गायकवाड, नातीगोती, वधू-वर सूचक केंद्र.

--------

मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा आहेच. मुलगा सरकारी किंवा खासगी कंपनीत नोकरदार, किमान ४० ते ५० हजारांपर्यंत पगार असावा, असा कल आहे. मुलगी चांगल्या घरी सुखी राहावी एवढीच माफक अपेक्षा असते.

- कोंडीराम महाराज नाटकर, माजलगाव.

-------

आमच्या समाजात मुलींची संख्या कमी आहे. तालुक्यातील ७० टक्के समाज पुणे व मोठ्या शहरात स्थिरावला आहे. मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा राहणारच आहे. शिक्षित वरस्थळ शोधत आहोत.

- सुरेंद्र जोशी, माजलगाव.