शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST

गेवराई : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पन्नासवर्षीय शेतकऱ्याने आपल्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ ...

गेवराई : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पन्नासवर्षीय शेतकऱ्याने आपल्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस आली.

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील गावखोर तांडामधील विजय श्रीराम पवार ( वय ५०) यांच्यावर कर्ज होते. नापिकी व अस्मानी संकटामुळे घेतलेले कर्ज फेडणे अशक्य होते. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असल्याने या कर्जबाजारीपणाला कंटाळून घरातील सर्व व्यक्ती गाढ झोपेत असताना चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन विजय पवार यांनी आत्महत्या केली. पहाटे घरातील सर्व मंडळी जागे झाले असता विजय पवार यांनी गळफास घेतल्याचे पाहिले. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तलवाडा पोलिसांना माहिती दिली. तलवाडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार खाडे, वरकड, तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. विजय पवार यांचे आरोग्य केंद्र जातेगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले. मयत विजय पवार यांच्या पश्चात पाच मुली, मुलगा, पत्नी आई, असा परिवार आहे.