शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या दरात घसरण; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

पाच दिवसांत तीन हजारांची घसरण : सोयाबीन काढणीला झाली सुरुवात बीड : सोयाबीन हे चांगला भाव मिळणारे पीक असल्याने ...

पाच दिवसांत तीन हजारांची घसरण : सोयाबीन काढणीला झाली सुरुवात

बीड : सोयाबीन हे चांगला भाव मिळणारे पीक असल्याने जिल्ह्यात कापूस क्षेत्रामध्ये घट होऊन सोयाबीनचा पेरा एक लाख हेक्टरने वाढला. हंगामाच्या सुरुवातीला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी अनेक स्वप्ने बघितली होती; मात्र मागील पाच दिवसांत सोयाबीन दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली असून, ५ हजार ७०० रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा सोयाबीन पिकाला मिळणारा भाव कमी झाला आहे. मागील हंगामाच्या शेवटी सोयाबीनला ११ हजारांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या. परिणामी, जिल्ह्यात जवळपास २ लाख ८५ हजार हेक्टर इतक्या विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. सोयाबीन पीक चांगले बहरात असताना अतिवृष्टीमुळे काही तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनातदेखील घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पादनात अतिवृष्टीमुळे घट झाली तरीदेखील चांगला भाव असल्यामुळे ही तूट भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु मागील पाच दिवसांत सोयाबीनच्या दरात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, सोयाबीन आयात केल्यामुळे हे दर कमी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

एकरी चार हजारांचा खर्च

सोयाबीन पेरणी ते काढणीपर्यंत एकरी जवळपास ३५०० ते ४ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरच चार पैसे त्यांच्या हातात राहणार आहेत; मात्र सोयाबीन काढणीला आल्यानंतर अचानक भाव पाडून शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी यंत्रणा शासनाकडून राबवली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केला आहे.