शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

सोयाबीनच्या दरात घसरण; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

पाच दिवसांत तीन हजारांची घसरण : सोयाबीन काढणीला झाली सुरुवात बीड : सोयाबीन हे चांगला भाव मिळणारे पीक असल्याने ...

पाच दिवसांत तीन हजारांची घसरण : सोयाबीन काढणीला झाली सुरुवात

बीड : सोयाबीन हे चांगला भाव मिळणारे पीक असल्याने जिल्ह्यात कापूस क्षेत्रामध्ये घट होऊन सोयाबीनचा पेरा एक लाख हेक्टरने वाढला. हंगामाच्या सुरुवातीला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी अनेक स्वप्ने बघितली होती. मात्र, मागील पाच दिवसांत सोयाबीन दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली असून, ५ हजार ७०० रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा सोयाबीन पिकाला मिळणारा भाव कमी झाला आहे. मागील हंगामाच्या शेवटी सोयाबीनला ११ हजारांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या. परिणामी जिल्ह्यात जवळपास २ लाख ८५ हजार हेक्टर इतक्या विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. सोयाबीन पीक चांगले बहरात असताना अतिवृष्टीमुळे काही तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात देखील घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पादनात अतिवृष्टीमुळे घट झाली तरीदेखील चांगला भाव असल्यामुळे ही तूट भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, मागील पाच दिवसांत सोयाबीनच्या दरात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, सोयाबीन आयात केल्यामुळे हे दर कमी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

एकरी चार हजारांचा खर्च

सोयाबीन पेरणी ते काढणीपर्यंत एकरी जवळपास ३५०० ते ४ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरच चार पैसे त्यांच्या हातात राहणार आहेत. मात्र, सोयाबीन काढणीला आल्यानंतर अचानक भाव पाडून शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी यंत्रणा शासनाकडून राबवली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केला आहे.