शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मृत साठ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे धारूर तालुक्यातील चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीत या तलावात केवळ २७ ...

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे धारूर तालुक्यातील चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीत या तलावात केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तलाव मृत साठ्यात गेले असताना शेतकरी बेसुमार उपसा करत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिंद्रुडकरांना येत्या महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून दिंद्रुडची नोंद आहे. सुमारे १८ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या दिंद्रुडकरांना चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. या तलावात शेतकऱ्यांनी १५० ते २०० मोटारी टाकून शेतीसाठी बेसुमार उपसा सुरू केला आहे. दिंद्रुड ग्रामपंचायतीने तलावातील पाणी आरक्षित करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धारूर तहसीलकडे मागणी केली आहे. मात्र, तहसीलकडून कुठलीही दखल अद्याप घेतलेली नाही. अवैधरीत्या पाणी उपसा तात्काळ थांबवला नाही तर दिंद्रुडकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.

आदेश नाही, सूचना नाही

यासंदर्भात लोकमतने पाटबंधारे विभागाकडे संपर्क साधला असता पिण्याचे पाणी आरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा कुठलाही आदेश आम्हाला मिळाला नाही. पालकमंत्र्यांची बैठक झाली नाही. यामुळे आम्ही शेतकऱ्यांना मोटारी काढण्याच्या सूचना देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.

मंडळ अधिकाऱ्यांना निर्देश

धारूरच्या तहसीलदार व्ही. एस. शिडोळकर यांच्याशी संपर्क केला असता ग्रामपंचायत दिंद्रुडचे निवेदन मिळाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मंडळ अधिकारी यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

बेसुमार उपसा थांबवा

चाटगाव तळ्यातील चालू असलेल्या पाण्याच्या मोटारी बंद करत दिंद्रुडकरांसाठी पाणी आरक्षित करण्यात यावे. या मागणीसाठी १५ दिवसांपूर्वी धारूर तहसीलला निवेदन दिले आहे. अद्याप तहसीलकडून कुठलीही कारवाई न झाल्याने तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. आगामी काळात पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्यास धारूर प्रशासन जबाबदार असणार आहे. - अजय कोमटवार, सरपंच, दिंद्रुड

===Photopath===

010421\img-20210331-wa0130_14.jpg

===Caption===

चाटगाव येथील या तलावातून दिंद्रुडला पाणी पुरवठा होतो. मात्र मृत साठ्यात असलेल्या तलावातून बेसुमार उपसा सुरू आहे. तो थांबविण्याची मागणी होत आहे.