शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मृत साठ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे धारूर तालुक्यातील चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीत या तलावात केवळ २७ ...

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे धारूर तालुक्यातील चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीत या तलावात केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तलाव मृत साठ्यात गेले असताना शेतकरी बेसुमार उपसा करत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिंद्रुडकरांना येत्या महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून दिंद्रुडची नोंद आहे. सुमारे १८ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या दिंद्रुडकरांना चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. या तलावात शेतकऱ्यांनी १५० ते २०० मोटारी टाकून शेतीसाठी बेसुमार उपसा सुरू केला आहे. दिंद्रुड ग्रामपंचायतीने तलावातील पाणी आरक्षित करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धारूर तहसीलकडे मागणी केली आहे. मात्र, तहसीलकडून कुठलीही दखल अद्याप घेतलेली नाही. अवैधरीत्या पाणी उपसा तात्काळ थांबवला नाही तर दिंद्रुडकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.

आदेश नाही, सूचना नाही

यासंदर्भात लोकमतने पाटबंधारे विभागाकडे संपर्क साधला असता पिण्याचे पाणी आरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा कुठलाही आदेश आम्हाला मिळाला नाही. पालकमंत्र्यांची बैठक झाली नाही. यामुळे आम्ही शेतकऱ्यांना मोटारी काढण्याच्या सूचना देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.

मंडळ अधिकाऱ्यांना निर्देश

धारूरच्या तहसीलदार व्ही. एस. शिडोळकर यांच्याशी संपर्क केला असता ग्रामपंचायत दिंद्रुडचे निवेदन मिळाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मंडळ अधिकारी यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

बेसुमार उपसा थांबवा

चाटगाव तळ्यातील चालू असलेल्या पाण्याच्या मोटारी बंद करत दिंद्रुडकरांसाठी पाणी आरक्षित करण्यात यावे. या मागणीसाठी १५ दिवसांपूर्वी धारूर तहसीलला निवेदन दिले आहे. अद्याप तहसीलकडून कुठलीही कारवाई न झाल्याने तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. आगामी काळात पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्यास धारूर प्रशासन जबाबदार असणार आहे. - अजय कोमटवार, सरपंच, दिंद्रुड

===Photopath===

010421\img-20210331-wa0130_14.jpg

===Caption===

चाटगाव येथील या तलावातून दिंद्रुडला पाणी पुरवठा होतो. मात्र मृत साठ्यात असलेल्या तलावातून बेसुमार उपसा सुरू आहे. तो थांबविण्याची मागणी होत आहे.