शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST

बीड : आरोग्याच्या दृष्टीने माहिती नसलेल्या; परंतु शरीरास अपायकारक असलेल्या अनेक गोष्टी आहेत. यात शरीरात पाणी जास्त झाले अथवा ...

बीड : आरोग्याच्या दृष्टीने माहिती नसलेल्या; परंतु शरीरास अपायकारक असलेल्या अनेक गोष्टी आहेत. यात शरीरात पाणी जास्त झाले अथवा कमी झाले तरी ते त्रासदायक ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी १८ वर्षांवरील व्यक्तींनी दिवसाकाठी ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

शरीराला पाण्याती अत्यंत गरज आहे; परंतु त्यातही मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत. आपण पाणी पिल्यानंतर ते बाहेरही तेवढ्याच प्रमाणात पडते. घाम, लघवी, उलटी आदींच्या माध्यमातून शरीरातील पाणी कमी होते, तसेच काही लोक जास्तीचे पाणी पितात; परंतु तेदेखील शरीराला अपायकारक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अन्नसेवनासह पाणी पिण्यालाही मर्यादा घालण्याची गरज आहे.

--

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीरात पाणी कमी पडले, तर तहान जास्त लागते. तसेच बेचैन होणे, बेशुद्ध पडणे, दम लागणे, जागरूकतेवर परिणाम हाेणे, ब्लड प्रेशर लो होणे आदी त्रास होतो. उलटी, संडास, गरमी, डायबिटिस यामुळे शरीरातील पाणी कमी होते.

--

शरीरात पाणी जास्त झाले तर...

शरीरात मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाले, तर दम लागतो. तसेच अंगावर सुज येणे, धडधड होणे यासारखा त्रास होतो; परंतु ज्यांची किडनी सक्षम आहे, त्यांना याचा त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले.

--

१८ वर्षांवरील व्यक्तीने दिवसाकाठी ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात जास्त पाणी झाले अथवा कमी पडले तरी त्रास होतो. नागरिकांनी थोडाही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. यशवंत खाेसे, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ, बीड

--

१८ व त्यापुढील वयोगट - दिवसाकाठी ४ ते ५ लिटर पाणी प्यावे

220921\22_2_bed_1_22092021_14.jpg

डॉ.यशवंत खोसे