शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

निवडणुकांची चाहूल : शहरात विविध कार्यक्रम वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:38 IST

प्रभागातील रखडलेल्या समस्याही आल्या ऐरणीवर अंबाजोगाई : नगर परिषदेच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल आता शहरवासीयांनाही लागली आहे. ...

प्रभागातील रखडलेल्या समस्याही आल्या ऐरणीवर

अंबाजोगाई : नगर परिषदेच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल आता शहरवासीयांनाही लागली आहे. गेल्या अनेक वर्षांत न फिरकणारे नगरसेवकही खडबडून जागे झाले आहेत. या निमित्ताने आता रखडलेल्या समस्याही ऐरणीवर आल्या आहेत, तर अनेकांनी आता विविध उपक्रम व कार्यक्रम सुरू केले आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे ठप्प राहिले. अंबाजोगाई शहर एप्रिल व मे महिन्यांत कोरोनाचे हॉटस्पॉट राहिले. शहरात हजारो जणांना कोरोनाची बाधा झाली, तर शेकडो जणांचा बळी गेला. स्थिती गंभीर राहिली. जून-जुलै महिन्यांपासून परिस्थिती नियंत्रणात आली. अनेक कुटुंबांवर संकटांचा डोंगर कोसळला. यात अनेकजण सावरले. पण, कुटुंबातील सदस्य गमावल्याची रुखरुख आजही अनेकांच्या मनात आहे. अशा कठीण प्रसंगांत कोण कोणाच्या मदतीला धावून आले, कोणाची मदत कशी झाली, कोणी कोणाला बगल दिली.या सर्व गोष्टींची उकल आता सुरू झाली आहे. शासनाने कडक निर्बंध दूर करून बाजारपेठेसह अनेक गोष्टी खुल्या केल्या आहेत.

त्यातच, न्यायालयानेही आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेवर घ्या, असे शासनाला सुचवल्याने नगर परिषदेच्या निवडणुका लवकरच लागतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबर महिन्यात नगर परिषदेचा कालावधी संपतो. जर निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या, तर तीन महिन्यांत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच कमी झालेले निर्बंध यामुळे अनेकांनी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कामाची सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांनंतर या वर्षीचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होताना दिसला. तर, आता इच्छुकांचे वाढदिवसही जोरात होऊ लागले आहेत. शहरात हळूहळू बॅनरबाजी जोर धरू लागली आहे.

वाढदिवसानिमित्त जेवणावळी वाढल्या आहेत. प्रभागात रखडलेली कामे, निर्माण झालेल्या समस्याही अचानक ऐरणीवर आल्या आहेत. तर, राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकही आता दररोज नगर परिषद कार्यालयात दिसू लागले आहेत. एकूणच राजकीय वातावरण निर्माण होऊ लागले आहे. शहरातही आता नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा होऊ लागली आहे. नवीन इच्छुकांनीही कोणी सेवेच्या तर कोणी बॅनरबाजीच्या माध्यमातून आपण भावी उमेदवार आहोत, अशी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकंदरीत दीड वर्षांपासून झालेले शांततामय वातावरण मात्र आता राजकीय रंग घेऊ लागले आहे.