शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

माता रमाईंच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब प्रज्ञासूर्य झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:29 IST

माजलगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना अभ्यासात गुंतलेल्या मनाला अडथळा होणार नाही यासाठी रमाई मातेने सर्व ...

माजलगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना अभ्यासात गुंतलेल्या मनाला अडथळा होणार नाही यासाठी रमाई मातेने सर्व काळजी घेतली. कष्ट करून त्यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावला. या माता रमाईच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब प्रज्ञासूर्य झाले, असे मत लढा मानव मुक्तीचे सचिन उजगरे यांनी व्यक्त केले.

येथील नवयान बुद्ध विहार माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उजगरे बोलत होते. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते धम्माभाऊ साळवे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते लढा मानव मुक्तीचे सचिन उजगरे, भगवान ससाने, अश्विन डावरे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून सोनाजी घडसे, बाबासाहेब राऊत, वैजनाथ पायके, पांडुरंग शिरसाट यांनी उपस्थिती लावली.

अश्विन डावरे, भगवान ससाने, बाबासाहेब राऊत, सोनाजी घडसे, लखन सहजराव यांनीही माता रमाई यांच्या त्यागाची उपस्थितांना जाणीव करून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सिरसट यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवाजी नवगिरे, कृष्णा सुरवसे, प्रवीण सिरसाट, मुकुंद माने, परमेश्वर एम. सिरसट, परमेश्वर आर. सिरसट, पिंटू थोरात, सुनील खंडागळे, देवराव घोडे, रमेश सिरसट, मधुकर साळवे, सागर सिरसट, अशोक सुरवसे, सचिन घोडे, परमेश्वर नवगिरे, राजेंद्र शिरसट व नवयान बुद्ध विहार सादोळा येथील तरुणांनी परिश्रम घेतले. शेवटी दत्ता जाधव यांनी आभार केले.