शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

माता रमाईंच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब प्रज्ञासूर्य झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:29 IST

माजलगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना अभ्यासात गुंतलेल्या मनाला अडथळा होणार नाही यासाठी रमाई मातेने सर्व ...

माजलगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना अभ्यासात गुंतलेल्या मनाला अडथळा होणार नाही यासाठी रमाई मातेने सर्व काळजी घेतली. कष्ट करून त्यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावला. या माता रमाईच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब प्रज्ञासूर्य झाले, असे मत लढा मानव मुक्तीचे सचिन उजगरे यांनी व्यक्त केले.

येथील नवयान बुद्ध विहार माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उजगरे बोलत होते. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते धम्माभाऊ साळवे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते लढा मानव मुक्तीचे सचिन उजगरे, भगवान ससाने, अश्विन डावरे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून सोनाजी घडसे, बाबासाहेब राऊत, वैजनाथ पायके, पांडुरंग शिरसाट यांनी उपस्थिती लावली.

अश्विन डावरे, भगवान ससाने, बाबासाहेब राऊत, सोनाजी घडसे, लखन सहजराव यांनीही माता रमाई यांच्या त्यागाची उपस्थितांना जाणीव करून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सिरसट यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवाजी नवगिरे, कृष्णा सुरवसे, प्रवीण सिरसाट, मुकुंद माने, परमेश्वर एम. सिरसट, परमेश्वर आर. सिरसट, पिंटू थोरात, सुनील खंडागळे, देवराव घोडे, रमेश सिरसट, मधुकर साळवे, सागर सिरसट, अशोक सुरवसे, सचिन घोडे, परमेश्वर नवगिरे, राजेंद्र शिरसट व नवयान बुद्ध विहार सादोळा येथील तरुणांनी परिश्रम घेतले. शेवटी दत्ता जाधव यांनी आभार केले.