शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा ; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

बीड : ज्ञानदान सारख्या पवित्र क्षेत्रात जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या शेकडाे तरूणांच्या आशेवर मागील दहा वर्षात पाणी फेरल्याचे दिसत आहे. ...

बीड : ज्ञानदान सारख्या पवित्र क्षेत्रात जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या शेकडाे तरूणांच्या आशेवर मागील दहा वर्षात पाणी फेरल्याचे दिसत आहे. जवळपास एक तप पूर्ण होत आला तरी शिक्षक भरती प्रक्रिया नसल्याने डीएड , बीएडचे शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रा ऐवजी दुसरीकडे रोजगार शोधण्याची वेळ या तरूण पिढीवर आली असून उमेदीचे वर्ष निघून जात असल्याने नैराश्यही वाढत आहे. या परिस्थितीमुळे शिक्षकांची भरती न झाल्याने नोकऱ्या मिळतील की नाही याची खात्री नाही आणि आशाही नसल्याने डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बीड जिल्ह्यातही दिसून येत आहे. जिल्ह्यात डीएड व बीएड शिक्षण घेऊन भरतीची प्रतीक्षा करणाऱ्यांची संख्या ४० ते ४५ हजारांच्या आसपास आहे. ही परिस्थिती लक्षात घेता डीएड शिक्षणाबद्दलचे आकर्षण नव्या पिढीपुढे राहिलेले नाही. मागील काही वर्षात बारावी उत्तीर्ण मुलांचा मेडिकल, इंजिनिअरिंगकडे जाण्याचा कल वाढलेला दिसत आहे.

१) जिल्ह्यातील डीएड कॉलेज - २५

एकूण जागा - २०००

आलेले अर्ज - ६५०

प्रवेश निश्चित - ६००

२) नोकरीची हमी नाही !

२०१०-११ नंतर शिक्षक भरती झालेली नाही. शिक्षण घेऊन नोकरीसाठी आठ- दहा वर्षांपासून वाट पाहण्याची वेळ आलेली आहे. नोकरीची हमी नसल्याने नवीन मुले या क्षेत्राकडे येण्यास इच्छुक दिसत नाही. पूर्वी डीएड कॉलेज पूर्ण क्षमतेने भरायची मात्र २०१४-१५ नंतर घरघर लागली आहे. शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नसेल तर डीएड. बीएड. करायचे कशाला? अशी मानसिकता वाढली आहे.

----------

३) इतर अभ्यासक्रमांना घेतला प्रवेश

घरची नाजूक परिस्थिती असल्याने मला डीएड शिक्षण घ्यायचे होते. मात्र २०१० पासून भरतीच नसल्याने उपयोग काय ? म्हणून मी डीएडला जाण्याचे टाळले. मागील काही वर्षांपासून मी एमपीएससी, जिल्हा निवड समित्यांच्या विविध पदांच्या परीक्षा देत असून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - किशोर चव्हाण, बीड.

-----------

माझे २००७ मध्ये डीएड झाले. २०१७ पासून शासनाचे नेमके धोरण समजलेले नाही. होते तेवढ्या भांडवलावर जनरल स्टोअर्स चालविले. दिव्यांग असल्याने शिक्षण क्षेत्रात जाणे सुलभ वाटले होते. भरतीच नसल्याने नाईलाजाने आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे. -- बाळासाहेब बहिर, बीड.

-------------

४) प्राचार्य म्हणतात...

दहा वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरतीचा एक लॉट पूर्ण केल्यास आशा पल्लवीत होतील. त्याचबरोबर डीएड शिक्षणाला चांगले दिवस येतील.

-- जयपाल कांबळे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई.

----------------

सध्या शिक्षक भरती नसल्याने प्रशिक्षणार्थ्यांचा ओघ कमी झाला आहे. शासनाने किमान दोन वर्षात एकदा तरी भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डीएड प्रवेशाचा टक्का आणखी कमी होण्याची शक्यता जाणवत आहे.

-- ज्ञानेश्वर सरकुंडे, प्राचार्य, स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालय, बीड.

------