शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

डॉक्टरांनो सावधान; उपचारातील हलगर्जीमुळे रुग्ण दगावल्यास थेट निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST

बीड : शासकीय आरोग्य संस्थेत रुग्ण गंभीर असताना अपघात विभागात त्याची टोलवाटोलवी होते. त्याला वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे ...

बीड : शासकीय आरोग्य संस्थेत रुग्ण गंभीर असताना अपघात विभागात त्याची टोलवाटोलवी होते. त्याला वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रूग्ण दगावतात; परंतु आता असे झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचे थेट निलंबन होणार आहे. शासनाने शुक्रवारी तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य देऊन उपचारात हलगर्जी होणार नाही, याबाबत सजग राहण्याची गरज आहे.

अपघात, साप चावलेले, झटका अथवा इतर गंभीर रुग्ण सर्वांत अगोदर अपघात विभागात येतात. येथील वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करतात; परंतु नंतरच्या तपासण्या, खाट आदी सुविधांबाबत त्यांना टोलवाटोलवी केली जाते. यात त्यांचा बहुतांश वेळ वाया जातो. अनेकदा रुग्ण दगावल्याचीेही प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. अशाच एका प्रकाराला समोर ठेवून शासनाने शुक्रवारी आदेश काढत कामचुकार डॉक्टरांना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे अपघात विभागात आलेल्या रुग्णावर उपचार करण्यास हलगर्जी अथवा त्याला इकडे तिकडे पळवापळवी केल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नियम ३ चा भंग केला म्हणून शिस्तभंगाची कारवाईही प्रस्तावित केली जाणार आहे. या आदेशाने आता शासकीय संस्थेतील अपघात विभागात काम करणाऱ्या हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत, तर यामुळे प्रामाणिक डॉक्टरांना समाधान मिळाले आहे.

बीडमध्ये कायम टोलवाटोलवी

येथील जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात गंभीर रुग्णांवर केवळ उपचार केले जातात. नंतर त्यांच्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या; परंतु डॉक्टरांवर कारवाया झाल्या नाहीत. यामुळेच कामचुकारांचे मनोबल वाढत गेले. आता या निर्णयाने वचक बसणार आहे.