शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तहसीलचे धनादेश स्वीकारण्यास जिल्हा बँकेचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST

माजलगाव : तहसील कार्यालयाने वृद्ध, गरीब, अपंग, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ अशा विविध योजनांतर्गत राज्य सरकारने ...

माजलगाव : तहसील कार्यालयाने वृद्ध, गरीब, अपंग, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ अशा विविध योजनांतर्गत राज्य सरकारने वाटपासाठी दिलेले धनादेश व याद्या स्वीकारण्यास बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेकडून नकार दिल्याने मागील तीन महिन्यांपासून निराधारांची हेळसांड होत आहे.

तालुक्यातील गोरगरीब, अपंग, वृद्ध, निराधार लोकांना आधार मिळण्यासाठी शासनाची संजय गांधी, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ योजना आहे. या योजनेत पात्र लोकांना आर्थिक मदत म्हणून शासन दरमहा पैसे देते. मात्र, या ठिकाणी दोन - तीन महिन्यात एकदा पैसे येतात. त्याचे वाटप विविध बँकांमार्फत करण्यात येते. फेब्रुवारी व मार्च महिन्यात तहसील कार्यालयाच्या वतीने भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय पोस्ट खाते व जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी तहसील कार्यालयाने पात्र लोकांच्या याद्या व रकमेचे धनादेश दिले. ते इतर सर्व बँकांनी स्वीकारून वाटपही केले. मात्र, येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तहसीलचा धनादेश व याद्या स्वीकारल्याच नाहीत. यापूर्वीचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्हा बँकेतील निराधारांची खाती बंद करून टाकण्याचे आदेश असल्याचा हवाला देत फेब्रुवारी व मार्च महिन्याचे धनादेश न स्वीकारल्याने निराधारांवर कोरोना व लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी बँक व्यवस्थापकांना फोन केला. परंतु त्यांनी उचलला नाही, असे सांगण्यात आले.

लेखी आदेश नसल्याचे कारण

यापूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील निराधारांचे खाते बंद करून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे, असे आदेश दिले होते. मात्र, वृद्धांच्या हातांचे ठसे उमटत नसल्याने नवीन खाते उघडत नाहीत, अशी अडचण निर्माण झाल्याने याविरुद्ध लोकांनी आंदोलने केली. म्हणून पुन्हा या बँकेच्या मार्फत पैसे देण्यात येत होते. मात्र, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांनी लेखी दिले नसल्याने त्याचा आधार घेऊन येथील व्यवस्थापक तहसीलदारांचे आदेश डावलत असल्याचे दिसून येत आहे.

बँकेच्या अधिकाऱ्यांकड विचारणा करू

तहसील कार्यालयाकडून फेब्रुवारीमध्ये २ हजार ६९७ लाभार्थ्यांना वाटपासाठी ३ लाख ५७ हजार रुपये, तर मार्च महिन्यात २ हजार ४२५ लाभार्थ्यांना वाटपासाठी ७६ लाख ९२ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले होते. जिल्हा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून, याबाबत त्यांना विचारणा करण्यात येईल व याबाबतचा प्रश्न तत्काळ सोडवण्यात येईल.

- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव