शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृतांचा आकडा जखमींच्या तुलनेत वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय महामार्गांचे काम नव्याने झाले आहे. तसेच अंतर्गत छोटे, मोठेही रस्ते चांगले झाले ...

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय महामार्गांचे काम नव्याने झाले आहे. तसेच अंतर्गत छोटे, मोठेही रस्ते चांगले झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत. यामुळे लॉकडाऊन असतानाही ४९४ अपघांत झाले. यात तब्बल २८९ जणांचा बळी गेला असून २९५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पूर्वी जखमी जास्त आणि मयत कमी असायचे. आता हे अंतर जवळपास सारखे होताना दिसत आहे.

कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन लागले. त्याप्रमाणे एप्रिल व मे महिन्यात बीड जिल्ह्यात केवळ बोटावर मोजण्याइतकेच अपघात झाले; परंतु त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाले आणि वाहनधारक सुसाट वाहने चालवू लागले. त्यातच जिल्ह्यातील छोट्या रस्त्यांपासून ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतचे सर्वच रस्ते नव्याने झाले आहेत. त्यामुळे वेगावरही नियंत्रण राहिले नाही.

२२ अपघातरोध ठिकाणे

जिल्ह्यात मांजरसुंबा घाट, धारूर घाट, गेवराई बायपास अशा विविध २२ ठिकाणी सार्वाधिक अपघात होत असल्याचे वाहतूक शाखेने एकदा केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. या ठिकाणी वेग मर्यादाही ठरवून दिली होती; परंतु रस्ता चांगला असल्याने वाहनधारक या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते.

राज्य रस्त्यांवर २०० अपघात

जिल्ह्यात राज्य रस्त्यांवर सार्वाधिक २०० अपघात झाले आहेत. यात १०० जणांचा बळी गेला आहे. राष्ट्रीय महामार्गावर १४२ अपघात झाले असून १०० जणांचा मृत्यू झाला. इतर मार्गांवर ८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

एप्रिलमध्ये केवळ ७ अपघात

एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ होता. यावेळी कोरोनाची भीतीही खूप होती. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत होते. याचा परिणाम अपघातांवरही झाला. या महिन्यात केवळ ७ अपघात होऊन ३ तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यात २७ बळी गेले होते.

काय आहेत अपघातांची कारणे

रस्ते चांगले झाल्याने वेगावर नियंत्रण राहिले नाही. दारू पिऊन वाहने चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, सीट बेल्ट न लावणे, वेग नियमांचे पालन न करणे आदी कारणे अपघातांना आहेत. सार्वाधिक अपघात दुचाकींचे असून मयतही तेच जास्त आहेत.

एक नजर आकडेवारीवर

राष्ट्रीय महामार्गावर अपघात - १४२ - मयत १०० - गंभीर जखमी ८६ - किरकोळ जखमी ८ , इतर ४

राज्य महामार्गावर अपघात - २०० - मयत १०० - गंभीर जखमी ११३ - किरकोळ जखमी २०, इतर ११

इतर रस्ते अपघात - १५२ - मयत ८९, गंभीर जखमी ९६, किरकोळ जखमी ५, इतर ३

-----

पुरुष मयत २६७, गंभीर जखमी २५७, किरकोळ जखमी २९

महिला मयत २२, गंभीर जखमी ३८, किरकोळ जखमी ४

----

एकूण अपघात - ४९४

मयत - २८९

गंभीर जखमी - २९५

किरकोळ जखमी - ३३

----------महिनानिहाय आकडेवारी

महिना अपघात मयत जखमी

जानेवारी ६२ ३६ ३७

फेब्रुवारी ५३ १७ ४९

मार्च ४३ २४ २६

एप्रिल७३४

मे २७ १८ १६

जून ४३ ३२ २५

जुलै ४१ ३१ १६

ऑगस्ट ५१ ३१ ३१

सप्टेंबर ५५ ३१ ३०

ऑक्टोबर ६० ३४ ४८

नोव्हेंबर ५२ ३२ ४६

एकूण ४९४ २८९ ३२८