शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

मृत्युसत्र थांबेना; आरोग्य विभाग सुस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

बीड : कोरोनाबाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे, तरीही आरोग्य विभाग केवळ बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगत उपाययोजना करण्यात सुस्तच असल्याचे ...

बीड : कोरोनाबाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे, तरीही आरोग्य विभाग केवळ बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगत उपाययोजना करण्यात सुस्तच असल्याचे दिसत आहे. रविवारी जिल्ह्यात चोवीस तासांतील २३ व जुन्या १९ अशा ४२ मृत्यूची नोंद झाली. तसेच नवे ९६२ रुग्ण निष्पन्न झाले. ९७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात शनिवारी तब्बल ८ हजार ९२९ जणांची चाचणी केली गेली. त्याचे अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले. यात ९६२ नवे रुग्ण आढळले, तर ७ हजार ९६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ६४, आष्टी ८३, बीड २६८, धारुर ८१, गेवराई ८८, केज ८९, माजलगाव ४७, परळी २६, पाटोदा ७८, शिरूर १०९ व वडवणी तालुक्यातील २९ जणांचा समावेश आहे. तसेच ९७४ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मागील चोवीस तासांत २३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर जुन्या परंतु पोर्टलवर अपडेट झालेल्या १९ अशा एकूण ४२ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८१ हजार १८४ झाली असून, कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ७३ हजार ५२२ इतका झाला आहे. आतापर्यंत १८६१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या ५ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.

बैठका नको, उपाययोजना करा!

जिल्ह्यात दररोज कोरोनाबळी वाढत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक त्यांची यंत्रणा केवळ हे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. नुसत्या बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात उपाययोजना होत नसल्याचे मृत्युसत्र थांबत नसल्याचे दिसते. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

निष्क्रिय कारभारामुळे महसूलची यंत्रणा कार्यान्वित

जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आणि निष्क्रिय कारभारामुळेच जिल्हाधिकारी यांनी स्वत:ची यंत्रणा रुग्णालयात कामाला लावली आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार स्वत: रोज आढावा घेऊन सूचना करत आहेत. विशेष म्हणजे सूचना करूनही यात सुधारणा केल्या जात नाहीत. त्यामुळे सीईओंनीदेखील आपली जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लावली आहे.