शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

ट्रॅक्टरने शेतीची मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:34 IST

नियमबाह्य वाहतुकीमुळे अपघाताचा धोका अंबाजोगाई : नियमबाह्य व विनापरवाना वाहतुकीचे प्रमाण अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लॉकडाऊनसारखी स्थिती ...

नियमबाह्य वाहतुकीमुळे अपघाताचा धोका

अंबाजोगाई : नियमबाह्य व विनापरवाना वाहतुकीचे प्रमाण अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लॉकडाऊनसारखी स्थिती असतानाही वाहने रस्त्यावर सुसाट धावत आहेत. युवक मोठ्या प्रमाणात सुसाट वाहने चालवत आहेत. परिणामी लहान मोठे अपघात सातत्याने घडू लागले आहेत. अशा स्थितीत युवकांवर वाहन चालविताना पोलिसांनी निर्बंध घालावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी केली आहे.

कलावंतांच्या समस्या सोडविण्याची मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याचे कलावंतांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. प्रलंबित मानधनासह वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन समिती गठित करण्याच्या मागणीसाठी संघटनेचा सातत्याने पुढाकार आहे. शासनाने कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन सुरू करावे, अशी मागणी कलावंत संघटनेने केली आहे. या मागणीकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कलावंतांची उपेक्षा सुरू आहे.

लक्षणे असल्यास चाचणी करावी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्दी, ताप व खोकला, घसा खवखवणे, मळमळणे, चकरा येणे, आदी लक्षणे असणाऱ्या तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संदिग्ध रुग्णांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अंबाजोगाई शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या परिसरात कोरोना चाचणीसाठी स्वतंत्र केंद्र अस्तित्वात आहे. याठिकाणी चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार विपिन पाटील यांनी केले आहे.

उन्हाळी वर्गाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

अंबाजोगाई : कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे शाळेच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दहावी उन्हाळी वर्गाला ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाला अनेक शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन उपस्थितांचे प्रमाणही समाधानकारक आहे. नियमित शाळा होईपर्यंत ऑनलाईन अभ्यासावर भर दिला जाणार असल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात आले.