शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कालव्याच्या दुरूस्तीअभावी पिकांना पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST

अविनाश मुडेगांवकर अंबाजोगाई : मांजरा धरण तुडूंब भरले तरीही अद्याप कालव्यांची दुरूस्ती व देखभाल वेळेत न ...

अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई : मांजरा धरण तुडूंब भरले तरीही अद्याप कालव्यांची दुरूस्ती व देखभाल वेळेत न झाल्याने धरणातील पाणी सोडता येईना, परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नितांत आवश्यकता असतांनाही प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेमुळे कालव्यातून पाणी सोडण्यासाठी विलंब लागत आहे.

तब्बल चार वर्षानंतर कोरडे पडलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, धरण प्रशासनाने मार्च, एप्रिलमध्ये कामे न केल्याने अजूनही कालवे दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. कालव्यात मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहेत. तर अनेक ठिकाणी झालेल्या मोठ्या पावसामुळे कालवे फुटले आहेत.

पेरण्या होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाल्यामुळे अनेक ठिकाणची पिके आता सुकू लागली आहेत. तर अनेक ठिकाणच्या उसाला पाण्याची आवश्यकता आहे. दोन आठवडयात पाणी सुटले नाही तर मोठे संकट उद्भवणार आहे. मांजरा धरणाचे अधिकारी कालव्याच्या दुरूस्त्या रखडल्याचे कारण न सांगता शेतकऱ्यांकडूनच पाण्यासाठी मागणी नाही असे कारण पुढे करू लागले आहेत.

कालवा सल्लागार समितीची बैठकच नाही

धरणातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यासाठी मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. या बैठकीत दक्षतेची उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना असणाऱ्या पाण्याची आवश्यकता, पाणी सोडण्याचा कालावधीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होतात. मात्र अद्यापहीही बैठक न झाल्याने पाणी सोडण्याचा कालावधी लांबत चालला आहे.

धरणातून पाणी लवकर सोडावे

मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. यात आवाड शिरपुरा, नायगाव,सौंदणा,इस्थळ, आपेगाव,धानोरा (खु.), कोपरा - अंजनपूर, देवळा, पाटोदा, ममदापूर, आकोला,मुडेगाव, सुगाव, तडोळा, या गावांसह इतर गावांचा समावेश आहे. या परिसरातील पिकांना पाणी लवकर सोडण्यात यावे. अशी मागणी शेतकरी मधुसुदन कुलकर्णी यांनी केली आहे.

धरणातील पाणी लवकरच सोडणार

मांजरा धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांना देण्याबाबत विचार विनिमय सुरू असून या पूर्वीची कामे प्रगतीपथावर आहेत. दुरूस्त्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धरणातून कालव्यात पाणी सोडले जाईल. अशी माहिती मांजरा धरणाचे अभियंता शाहूराव पाटील यांनी लोकमतशी दिली आहे.

शेतकऱ्यांची अपेक्षा फोल

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने पेरण्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आटोपल्या. गहू, ज्वारी, हरभरा, करडई व उसाची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली.हरभरा, गहू, ज्वारीच्या पेरणीचा दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. आता पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे विहिरी व इंधन विहिरी नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी आजही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांची अपेक्षा फोल ठरली.