शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कालव्याच्या दुरूस्तीअभावी पिकांना पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST

अविनाश मुडेगांवकर अंबाजोगाई : मांजरा धरण तुडूंब भरले तरीही अद्याप कालव्यांची दुरूस्ती व देखभाल वेळेत न ...

अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई : मांजरा धरण तुडूंब भरले तरीही अद्याप कालव्यांची दुरूस्ती व देखभाल वेळेत न झाल्याने धरणातील पाणी सोडता येईना, परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नितांत आवश्यकता असतांनाही प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेमुळे कालव्यातून पाणी सोडण्यासाठी विलंब लागत आहे.

तब्बल चार वर्षानंतर कोरडे पडलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, धरण प्रशासनाने मार्च, एप्रिलमध्ये कामे न केल्याने अजूनही कालवे दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. कालव्यात मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहेत. तर अनेक ठिकाणी झालेल्या मोठ्या पावसामुळे कालवे फुटले आहेत.

पेरण्या होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाल्यामुळे अनेक ठिकाणची पिके आता सुकू लागली आहेत. तर अनेक ठिकाणच्या उसाला पाण्याची आवश्यकता आहे. दोन आठवडयात पाणी सुटले नाही तर मोठे संकट उद्भवणार आहे. मांजरा धरणाचे अधिकारी कालव्याच्या दुरूस्त्या रखडल्याचे कारण न सांगता शेतकऱ्यांकडूनच पाण्यासाठी मागणी नाही असे कारण पुढे करू लागले आहेत.

कालवा सल्लागार समितीची बैठकच नाही

धरणातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यासाठी मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. या बैठकीत दक्षतेची उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना असणाऱ्या पाण्याची आवश्यकता, पाणी सोडण्याचा कालावधीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होतात. मात्र अद्यापहीही बैठक न झाल्याने पाणी सोडण्याचा कालावधी लांबत चालला आहे.

धरणातून पाणी लवकर सोडावे

मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. यात आवाड शिरपुरा, नायगाव,सौंदणा,इस्थळ, आपेगाव,धानोरा (खु.), कोपरा - अंजनपूर, देवळा, पाटोदा, ममदापूर, आकोला,मुडेगाव, सुगाव, तडोळा, या गावांसह इतर गावांचा समावेश आहे. या परिसरातील पिकांना पाणी लवकर सोडण्यात यावे. अशी मागणी शेतकरी मधुसुदन कुलकर्णी यांनी केली आहे.

धरणातील पाणी लवकरच सोडणार

मांजरा धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांना देण्याबाबत विचार विनिमय सुरू असून या पूर्वीची कामे प्रगतीपथावर आहेत. दुरूस्त्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धरणातून कालव्यात पाणी सोडले जाईल. अशी माहिती मांजरा धरणाचे अभियंता शाहूराव पाटील यांनी लोकमतशी दिली आहे.

शेतकऱ्यांची अपेक्षा फोल

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने पेरण्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आटोपल्या. गहू, ज्वारी, हरभरा, करडई व उसाची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली.हरभरा, गहू, ज्वारीच्या पेरणीचा दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. आता पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे विहिरी व इंधन विहिरी नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी आजही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांची अपेक्षा फोल ठरली.