शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या दुरूस्तीअभावी पिकांना पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST

अविनाश मुडेगांवकर अंबाजोगाई : मांजरा धरण तुडूंब भरले तरीही अद्याप कालव्यांची दुरूस्ती व देखभाल वेळेत न ...

अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई : मांजरा धरण तुडूंब भरले तरीही अद्याप कालव्यांची दुरूस्ती व देखभाल वेळेत न झाल्याने धरणातील पाणी सोडता येईना, परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नितांत आवश्यकता असतांनाही प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेमुळे कालव्यातून पाणी सोडण्यासाठी विलंब लागत आहे.

तब्बल चार वर्षानंतर कोरडे पडलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, धरण प्रशासनाने मार्च, एप्रिलमध्ये कामे न केल्याने अजूनही कालवे दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. कालव्यात मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहेत. तर अनेक ठिकाणी झालेल्या मोठ्या पावसामुळे कालवे फुटले आहेत.

पेरण्या होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाल्यामुळे अनेक ठिकाणची पिके आता सुकू लागली आहेत. तर अनेक ठिकाणच्या उसाला पाण्याची आवश्यकता आहे. दोन आठवडयात पाणी सुटले नाही तर मोठे संकट उद्भवणार आहे. मांजरा धरणाचे अधिकारी कालव्याच्या दुरूस्त्या रखडल्याचे कारण न सांगता शेतकऱ्यांकडूनच पाण्यासाठी मागणी नाही असे कारण पुढे करू लागले आहेत.

कालवा सल्लागार समितीची बैठकच नाही

धरणातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यासाठी मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. या बैठकीत दक्षतेची उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना असणाऱ्या पाण्याची आवश्यकता, पाणी सोडण्याचा कालावधीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होतात. मात्र अद्यापहीही बैठक न झाल्याने पाणी सोडण्याचा कालावधी लांबत चालला आहे.

धरणातून पाणी लवकर सोडावे

मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. यात आवाड शिरपुरा, नायगाव,सौंदणा,इस्थळ, आपेगाव,धानोरा (खु.), कोपरा - अंजनपूर, देवळा, पाटोदा, ममदापूर, आकोला,मुडेगाव, सुगाव, तडोळा, या गावांसह इतर गावांचा समावेश आहे. या परिसरातील पिकांना पाणी लवकर सोडण्यात यावे. अशी मागणी शेतकरी मधुसुदन कुलकर्णी यांनी केली आहे.

धरणातील पाणी लवकरच सोडणार

मांजरा धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांना देण्याबाबत विचार विनिमय सुरू असून या पूर्वीची कामे प्रगतीपथावर आहेत. दुरूस्त्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धरणातून कालव्यात पाणी सोडले जाईल. अशी माहिती मांजरा धरणाचे अभियंता शाहूराव पाटील यांनी लोकमतशी दिली आहे.

शेतकऱ्यांची अपेक्षा फोल

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने पेरण्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आटोपल्या. गहू, ज्वारी, हरभरा, करडई व उसाची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली.हरभरा, गहू, ज्वारीच्या पेरणीचा दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. आता पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे विहिरी व इंधन विहिरी नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी आजही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांची अपेक्षा फोल ठरली.