शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे डाेळ्यादेखत पिकांचे नुकसान, तीन एकरातील उडीद भिजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:11 IST

आष्टी : पावसामुळे डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य आमच्या नशिबी आले. माझी कऱ्हेवडगांव शिवारात जमीन असून मागील ...

आष्टी : पावसामुळे डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य आमच्या नशिबी आले. माझी कऱ्हेवडगांव शिवारात जमीन असून मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पीके धोक्यात सापडली आहेत. पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण उडीद पाण्यात आहे. अगोदर संततधार पाऊस ३ ते ४ दिवसांपासून पडत असल्याने उभे उडीद पीक कोमेजले. आता रात्रीपासून अचानक जोरदार पाऊस कोसळल्याने काढलेल्या ३ एकर शेतातील उडीद पूर्णपणे भिजले आहेत. या पावसाने २ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असून शासनाने आमच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कऱ्हेवडगांव येथील भगवानराव सांगळे या शेतकऱ्याने केली. तर सावरगाव व मच्छिंद्रनाथ गड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे उडीद, कापूस, साेयाबीन, कांडे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सावरगाव येथील शेतकरी सोमनाथ क्षीरसागर यांनी केली.

तालुक्यात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी विविध भागात जोरदार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मच्छिंद्रगड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून काही ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत.नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर उडीद, बाजरी, मूग, सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असून ते भिजून मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

310821\img-20210831-wa0295_14.jpg