शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

महसूल उपायुक्तांकडून पीक नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

माजलगाव : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे माजलगाव तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून गुरुवारी महसूल उपायुक्त पराग सोमण, उपविभागीय अधिकारी ...

माजलगाव : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे माजलगाव तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून गुरुवारी महसूल उपायुक्त पराग सोमण, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून पिकांची पाहणी केली. यावेळी विलास साळवे व शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला. शेतातील उभ्या पिकांचे पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याचे शासनस्तरावर आदेश असल्याने गुरुवारी औरंगाबाद येथून महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी माजलगाव तालुक्याचा दौरा केला. शेतकऱ्यांचे हे नुकसान मोठे झाल्याने या विषयीचा अहवाल ते शासनाकडे सोपवणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, मंडळ अधिकारी पद्माकर मुळाटे, तलाठी मडकर, केसापुरीचे माजी सरपंच विलास साळवे, कांता पवार, सगीर देशमुख, मुंजाबा साबळे, अनिल फुलारी, विठ्ठल साबळे, महादेव जाधव, सचिन लहाडे, शिवाजी जोगडे, पप्पू भारसावडे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

-----

फुललेले सोयाबीन, सडलेला कापूस

केसापुरी, पात्रुड, नित्रुड आदी गावांतील शेतांतील सोयाबीन, कापूस, ऊस, तूर या पिकांची उपायुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्यांना केसापुरी येथे सोयाबीनला फुले आलेली, कापूस सडलेला, तूर, बाजरी, तीळ ओंबाळून गेल्याचे दिसून आले. या पिकांमध्ये अद्यापही पाणी साचलेले दिसून आले.

230921\purusttam karva_img-20210923-wa0003_14.jpg