शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महसूल उपायुक्तांकडून पीक नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

माजलगाव : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे माजलगाव तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून गुरुवारी महसूल उपायुक्त पराग सोमण, उपविभागीय अधिकारी ...

माजलगाव : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे माजलगाव तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून गुरुवारी महसूल उपायुक्त पराग सोमण, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून पिकांची पाहणी केली. यावेळी विलास साळवे व शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला. शेतातील उभ्या पिकांचे पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याचे शासनस्तरावर आदेश असल्याने गुरुवारी औरंगाबाद येथून महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी माजलगाव तालुक्याचा दौरा केला. शेतकऱ्यांचे हे नुकसान मोठे झाल्याने या विषयीचा अहवाल ते शासनाकडे सोपवणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, मंडळ अधिकारी पद्माकर मुळाटे, तलाठी मडकर, केसापुरीचे माजी सरपंच विलास साळवे, कांता पवार, सगीर देशमुख, मुंजाबा साबळे, अनिल फुलारी, विठ्ठल साबळे, महादेव जाधव, सचिन लहाडे, शिवाजी जोगडे, पप्पू भारसावडे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

-----

फुललेले सोयाबीन, सडलेला कापूस

केसापुरी, पात्रुड, नित्रुड आदी गावांतील शेतांतील सोयाबीन, कापूस, ऊस, तूर या पिकांची उपायुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्यांना केसापुरी येथे सोयाबीनला फुले आलेली, कापूस सडलेला, तूर, बाजरी, तीळ ओंबाळून गेल्याचे दिसून आले. या पिकांमध्ये अद्यापही पाणी साचलेले दिसून आले.

230921\purusttam karva_img-20210923-wa0003_14.jpg