शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात; त्रास झाल्यानंतर रुग्णालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यात लक्षणे नाहीत, परंतु कोरोनाबाधित असलेल्या लोकांची संख्या जवळपास ५५ टक्केपेक्षा अधिक आहे. हे लोक रुग्णालयात ...

बीड : जिल्ह्यात लक्षणे नाहीत, परंतु कोरोनाबाधित असलेल्या लोकांची संख्या जवळपास ५५ टक्केपेक्षा अधिक आहे. हे लोक रुग्णालयात राहून उपचार करण्यापेक्षा होम आयसोलेशनची परवानगी मागतात. आरोग्य विभागही सर्व कार्यवाही पूर्ण करून परवानगी देते. परंतु घरी गेल्यानंतर हे लोक काळजी घेत नाहीत. एवढेच नव्हे, तर जास्त त्रास व्हायला लागल्यावर रुग्णालयात धाव घेतात. येथे उपचारास उशीर झाल्यानंतर त्यांचा मृत्यू होत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालयांत खाटांची संख्या अपुरी पडत आहे. त्यातच लक्षणे नसल्याने लोक घरीच राहून उपचार घेतात. यात ५० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचाही समावेश असतो. त्यामुळे केअर टेकरने नियमित लक्ष ठेवून थोडाही त्रास जाणवल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे.

आरोग्य विभागाची यंत्रणा अपुरी

जिल्ह्यात होम आयसोलेट व होम क्वारंटाईन असलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा अपुरी पडत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना, सर्वेक्षण आणि उपचारातच ही यंत्रणा परेशान आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

६० वर्षांवरील वृद्धांना परवानगीच नाही

कोरोनाबाधित आल्यानंतर लक्षणे पाहून रुग्णांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून होम आयसोलेशनसाठी परवानगी दिली जात आहे. यातही ज्यांचे वय ६० पेक्षा अधिक आहे किंवा कोमॉर्बिड आजार, श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यांना परवानगी नाकारण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

पहिल्या २४ तासांत ३० टक्के मृत्यू

त्रास होत असतानाही काही लोक रुग्णालयात दाखल होण्यास उशीर करत आहेत. रुग्णालयात आल्यापासून पहिल्या २४ तासांत मृत्यू होण्याचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. त्यानंतर ४ दिवसांपर्यंत २० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी त्रास होण्यापूर्वीच तात्काळ रुग्णालय जवळ करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यात सोमवारपर्यंत जवळपास साडेतीन हजार रुग्णांना होम आयसोलेशन दिले होते. त्यांनी त्रास होण्यापूर्वीच रुग्णालयात दाखल व्हावे, अथवा निरीक्षणात असलेल्या डॉक्टरला तत्काळ संपर्क करावा. गैरसमज अथवा भीती बाळगून अंगावर दुखणे काढू नये. होम आयसोलेट लोकांवर नजर ठेवणे कठीण असले, तरी काळजी घेतो.

- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.