शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात ५० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:27 IST

बीड : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या मोक्याच्या प्लॉटचा ताबा घेण्यासाठी जीपमधून आणलेल्या गुंडांनी गोळीबार करुन ...

बीड : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या मोक्याच्या प्लॉटचा ताबा घेण्यासाठी जीपमधून आणलेल्या गुंडांनी गोळीबार करुन एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात ४० ते ५० अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, घटना घडल्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून इतरांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

डोंगरकिन्ही येथील कल्याण सयाजी येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी ते बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेले होते. यावेळी मारूती येवले, मुकुंदा येवले, विठ्ठल येवले, अण्णा येवले, जिजाबा येवले, गुजाबा येवले (सर्व रा.डोंगरकिन्ही) यांच्यासह विना क्रमांकाच्या जीपमधील ४० ते ५० जण त्याठिकाणी आले. त्यांच्यासोबत जेसीबी मशीन देखील होती. यावेळी ‘ही जागा ५ मिनिटात रिकामी करा’ अशी धमकी देत शिवीगाळ करुन दोघांनी कल्याण येवले यांच्या दिशेने दगडफेक केली. इतरांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. याच दरम्यान एकाने जिवे मारण्याच्या हेतूने कल्याण येवले यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीचा आवाज ऐकून गावातील लोकांनी गर्दी केली होती. त्यानंतर चारचाकीमधून आलेले सगळे जण फरार झाले. या प्रकरणी संबंधितांवर अंमळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना रात्रीच ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून इतरांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक डोंगरे करत आहेत.

जागेची किंमत वाढल्याने वाद

डोंगरकिन्ही बसस्थानकाजवळ जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. या शाळेसाठी जमीन देण्यात आलेली होती. त्याठिकाणी शाळेचे बांधकाम देखील काही वर्षापूर्वी झाले आहे. मात्र, शाळेच्या बाजूला मोकळी जागा आहे. याच ठिकाणावरून पैठण -पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे या प्लॉटचे भाव वाढले आहेत. याच्या मालकी हक्कावरून मागील काही वर्षापासून येवलेंच्या दोन गटात वाद सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे मात्र, तरी देखील एका गटातील व्यक्तीने या जागेचा सौदा केला असल्याची माहिती आहे. या प्लॉटचा ताबा घेण्यावरून दोन गटात धुसफूस नेहमीच सुरु असते. मात्र, बुधवारी थेट गोळीबार झाल्याने डोंगरकिन्हीत खळबळ उडाली होती. याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, सर्व आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.