शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

जलयुक्त शिवार योजनेत ८ कोटी २८ लाखांचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:36 IST

बीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ...

बीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३३ अधिकारी, कर्मचारी व १६७ गुत्तेदार संस्था तसेच सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील अधिकाऱ्यांकडून ५० टक्के व गुत्तेदारांकडून ५० टक्के रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा सर्व गैरव्यवहार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी पाठपुरावा करून उघडकीस आणला आहे.

जलयुक्त शिवार ही तत्कालीन शासनाची महत्त्वाकांक्षी योजना होती. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी परळीसह जिल्हाभरात जलयुक्त शिवार योजनांची कामे केली होती. त्यामध्ये बोगस कामे करून अधिकारी व गुत्तेदारांनी संगनमत करून जवळपास ८ कोटी २८ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. वसंत मुंडे यांनी केलेल्या तक्रारीत जलयुक्त शिवार योजनेच्या १३५९ कामांचा उल्लेख होता. त्यापैकी ३४४ कामे तपासली आहेत. वेळोवेळी केलेल्या तपासणीमध्ये कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे, तर अनेक ठिकाणी कामे न करता पैसे उचलल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात दक्षता पथकाकडून तपासणी केलेले सर्व अहवाल शासनाकडे पाठवण्यात आले आहेत, तर एसआयटी देखील स्थापन करण्यात आली असून, त्यांनी संपूर्ण चौकशी अहवाल आल्यानंतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर येणार असल्याचे वसंत मुंडे यांनी सांगितले.

गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ

सेवानिवृत्त कृषी सहसंचालक रमेश भताने व भीमराव बाजीराव बांगर, शंकर सखाराम गव्हाणे, दीपक पवार, सुनील जायभाय, कमल लिंबकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश १ एप्रिल रोजी शासनस्तरावरून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात होेती. दरम्यान, तक्रारदार वसंत मुंडे यांनी पुन्हा याचा पाठपुरावा केल्यानंतर १८ मे रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फक्त चार जण अटकेत; बाकीचे मोकाटच

जलयुक्त शिवार योजनेत ३३ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४ जण स्वत:हून अटक झाले होते. त्यांनी दोन महिने तुरुंगात राहून या कामातील वसुलीचे पैसे शासनाच्या तिजोरीत भरले व त्यानंतर पुन्हा त्यांना सेवेत घेण्यात आले. दरम्यान, यापैकी ३१ अधिकारी, कर्मचारी अद्याप फरार आहेत. पोलीस खातं राजकीय वरदहस्तामुळे अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.

गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या

एकूण ३३ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

ब्लॅकलिस्टेट केलेल्या मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंते ३६७

भ्रष्टाचार करण्यासाठी बदलेले अधिकारी

जलयुक्त शिवार योजनेतील बोगस देयके करण्यासाठी तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रमेश भताने यांनी अधिकाराचा गैरवापर करत तालुका कृषी अधिकारी उपविभागीय अधिकारी याचे चार्ज वेळोवेळी बदलले. ही सर्व बाब दोन चौकशी अहवालातून समोर आली आहे. त्यानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचार फार मोठा आहे. त्यामुळे या पैशाची वसुली अधिकारी व गुत्तेदारांकडून करण्यात येणार आहे. ती लवकरात लवकर करावी. तसेच राज्यात देखील असा भ्रष्टाचार झाल्याचे परळी व अंबाजोगाईतील कामांवरून स्पष्ट होत आहे. पुढे देखील या प्रकरणी पाठपुरावा सुरू राहील. एसआयटीने खरा रिपोर्ट या प्रकरणी शासनाकडे द्यावा म्हणजे सगळं समोर येईल.

वसंत मुंडे, काँग्रेस नेते.

===Photopath===

190521\19_2_bed_14_19052021_14.jpg~190521\19_2_bed_15_19052021_14.jpeg

===Caption===

जलयुक्त शिवार योजना ~वसंत मुंडे काँग्रेस नेते