शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

कोरोनाची नियमावली धाब्यावर; कारवाईला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : जीवघेण्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच शहरात मोठ्या धूमधडाक्यात लग्न सोहळ्यांचे आयोजन केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : जीवघेण्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच शहरात मोठ्या धूमधडाक्यात लग्न सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. आनंद उत्साहाच्या भरात लग्न सोहळ्यांमध्ये कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडविले जात असताना पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून कारवाईला ‘खो’ दिला जात असल्याचे चित्र आहे. कारवाई होत नसल्यामुळे अंबाजोगाईकर गाफील आहेत. अद्यापही कोरोना संपला नाही. याचे भान नागरिकांसह सुस्तावलेल्या प्रशासकीय यंत्रणेने ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत वयोवृद्धांसह तरुणांच्या मृत्यूची संख्या जास्त होती. या लाटेत अनेकांच्या संसाराची घडी कोलमडली. कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख वाढता असल्यामुळे फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत शहरातील रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली होती. रेमडेसिविरसह ब्लॅक फंगसच्या औषधींसाठी रुग्णांच्या नातेवाइकांवर अक्षरश: पायपीट करण्याची पाळी ओढवली होती. मे महिन्याच्या अखेरपासून ही लाट ओसरली. मागील काही दिवसांपासून बोटांवर मोजण्याइतपत रुग्णसंख्या आढळून येत असल्याचे पाहून अंबाजोगाई शहर व परिसरात धूमधडाक्यात लग्न सोहळ्यांचे आयोजन करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यादरम्यान, कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराची व प्रादुर्भावाची शक्यता बळावली आहे.

...

शहरवासीयांनी काळजी घ्यावी

कोरोनाचा प्रादवर्भाव अद्यापही संपला नाही, याचे भान ठेवण्याची गरज आहे. लग्न सोहळ्यात तसेच इतर कार्यक्रमात लहान मुलांच्या आरोग्याला जपण्याची नितांत आवश्यकता असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. कार्यक्रमांचे आयोजन करताना नियमांचे पालन करून कुटुंबीयांची काळजी घेण्याची अपेक्षा आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे.

...

सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘वॉच’ नाहीच

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लग्न सोहळ्यासह इतर कार्यक्रमांना मर्यादित उपस्थितीमध्ये प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचा ‘वॉच’ नसल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले आहेत.

...

केवळ ५० जणांच्या विवाहास परवानगी

शासनाच्या नवीन आदेशानुसार विवाह सोहळ्यास वधू-वरांकडील ५० जणांनाच विवाह समारंभात उपस्थित राहता येईल. त्या ५० जणांची यादी व कोरोना टेस्ट संबंधित पोलीस ठाण्यात देणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे.

....