शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

कोरोनाची धास्ती वर-वधू पित्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST

अविनाश मुडेगांवकर अंबाजोगाई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो वधू-वरपित्यांची चिंता वाढली आहे. अनेकांच्या निघालेल्या लग्नतारखा पुढे ढकलाव्या लागल्या, तर अनेकांनी आहे त्या स्थितीत २० ते २५ जणांच्या साक्षीने विवाह उरकले. मात्र, यंदा कर्तव्य असणाऱ्या जोडप्यांमध्ये धाकधूक वाढली असून, मेहंदी लावायच्या हातावर सॅनिटायझर चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

लग्नसराईचा खरा मौसम एप्रिल - मे या दोन महिन्यातच असतो. या दोन महिन्यात लग्नतारखा व विवाह मुहूर्त होते. अगोदरच सहा महिन्यांपासून वधू-वरपित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय बूक केले होते. लग्नसराईची लगबग व धावपळही बऱ्याच प्रमाणात सुरू होती. मात्र, मार्चअखेर व एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच कोरोना संसर्गाबाबत जनजागृती वाढली. अचानकच कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू करण्यात आले. या लॉकडाऊनचा वाढता कालावधी वधू-वर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला. लॉकडाऊनमुळे व संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध आले. जिथे घराच्या बाहेर निघण्याची सोय नाही तिथे विवाह तर दूरच राहिले. विवाहाच्या निमित्ताने अनेकांनी पत्रिका, कपडयांचे बस्ते व विविध प्रकारची तयारी केली होती. वधू-वरही आपआपल्या परीने तयारी लागले होते. अशातच या लॉकडाऊनने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. ज्या हातांवर मेहंदी लावायची, त्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ आली आहे. विवाह संस्था लॉकडाऊनमध्ये ठप्प राहिल्याने कपडा, सोने, सौंदर्यप्रसाधने, मंगल कार्यालय, बँड, केटरिंग, आचारी, बांगडया, भांडी, फर्निचर यांच्यासह विविध दुकानेही बंद आहेत. त्यांनाही या लग्नसराईचा मोठा फटका कोरोनामुळे सहन करावा लागला.

जुळलेले लग्न लॉकडाऊनमध्ये हाईना

प्रत्येक समाजात मुलींची कमी असणारी संख्या आणि त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे मुलांची लग्न जमणे, हीच मोठी डोकेदुखी झाली आहे. अशाही स्थितीत वधू संशोधन झाले. लग्न जुळले अन् जुळलेले लग्न लॉकडाऊनमुळे होईना. अशी अनेकांची स्थिती झाली आहे.

नोंदणी विवाह करणे झाले अवघड

कोरोनाच्या संकटामुळे गर्दी न करता मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह आटोपता घ्यावा. असा प्रयत्न असलेल्या अनेकांनी नाइलाजाने नोंदणी विवाहाचा मार्ग निवडला. पण, सध्या लॉकडाऊनमुळे हाही मार्ग अवघड होऊन बसला आहे.