शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

मौखिक निरीक्षणावरून राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये कोरोनाबाधिताचे शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

सोमनाथ खताळ बीड : संसर्ग वाढण्याच्या भीतीने मयत कोरोनाबाधित रुग्णाची चिरफाड न करता शवविच्छेदन करावे, अशी सूचना आयसीएमआरने (इंडियन ...

सोमनाथ खताळ

बीड : संसर्ग वाढण्याच्या भीतीने मयत कोरोनाबाधित रुग्णाची चिरफाड न करता शवविच्छेदन करावे, अशी सूचना आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) केली होती. त्याप्रमाणे बीडमध्ये आत्महत्या केलेल्या कोरोनाबाधिताचे मौखिक निरीक्षणाद्वारे शवविच्छेदन झाले आहे. अशी घटना महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंदविल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन न करता थेट अंत्यसंस्कार केले जातात. आयसीएमआरच्या देखील थेट शवविच्छेदन टाळण्याच्या सूचना आहेत. मात्र, शुक्रवारी बीडच्या जिल्हा रुग्णालयात असाच एक कठीण प्रसंग उद्भवला. शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना एकाने आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर पंचनामा करून अहवाल देण्याची विनंती बीड शहर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाला केली होती. पण, शवविच्छेदन करावे की नाही, यावर विचार झाला. महाराष्ट्रात यापूर्वी कोठेच असे शवविच्छेदन झालेले नसल्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न होता. अखेर आयसीएमआरच्या सुधारित निर्देशांप्रमाणे मृतदेहाचे विच्छेदन डॉ. गिरीश गुट्टे यांच्या मार्गदर्शनात डॉ. फरिदा यांनी केले.

आयसीएमआर निर्देश सांगतात...

आयसीएमआरने कोरोनाग्रस्तांच्या शवविच्छेदनासंदर्भाने निर्देश जारी केलेले आहेत. यात कोरोनाग्रस्तांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मयत घोषित करून उपचाराच्या कागदपत्राआधारे मृत्यूचे कारण द्यायचे आहे. मात्र अपघात, आत्महत्या अशा न्यायवैद्यक प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यकच असेल तर शक्यतो शवविच्छेदन टाळावे आणि करावेच लागले तर पोलिसांनी मृतदेहाचे वेगवेगळ्या अंगाने काढलेले फोटो पाठवावेत, त्या फोटोंचे आणि मृतदेहाचे बाह्य निरीक्षण करून आणि मयत व्यक्तीसंदर्भाने वैद्यकीय उपचार, मृत्यूवेळची शारीरिक परिस्थिती याची माहिती घेऊन त्यावरून मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा शवविच्छेदन अहवाल द्यावा, असे सांगितले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मृतदेहाची चिरफाड करू नये, असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार

जगात यापूर्वी जर्मनीने काही कोरोनाग्रस्त मृतदेहांचे विच्छेदन केले होते. त्यानंतर भारतात बंगळुरू येथे डॉ. दिनेश राव यांनी ऑक्टोबर २०२०मध्ये एका कोरोनाग्रस्त मृतदेहाचे विच्छेदन केले होते. त्यावेळी कोरोनाचे विषाणू मृतदेहाच्या तोंडात १४ ते १८ तास राहतात, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यामुळे पुन्हा कोणी शवविच्छेदन केलेले नव्हते. आजचे मौखिक शवविच्छेदन हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार आहे.