शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोना मृत्यूमुळे वाळीत टाकले, दोन दिवस पाणी दिले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:36 IST

शिरुर कासार (जि. बीड) : कोरोनामुळे निधन झाल्यानंतर आम्हांला गावातील लोकांनी पिण्यास पाणीही दिले नाही, अशी तक्रार बीड जिल्ह्यातील ...

शिरुर कासार (जि. बीड) : कोरोनामुळे निधन झाल्यानंतर आम्हांला गावातील लोकांनी पिण्यास पाणीही दिले नाही, अशी तक्रार बीड जिल्ह्यातील वारणी गावातील धोत्रे कुटुंबाने केल्याने खळबळ माजली. नायब तहसीलदार किशोर सानप यांनी या घटनेचा इन्कार केला. गावचे सरपंच तसेच पंचायत समितीचे माजी सभापती बाबूराव केदार यांनी पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य देऊन आणि ५ हजार रुपये खर्चासाठी दिले होते, असे सानप यांनी सांगितले.

वारणी येथील धोतरे कुटुंबातील सोनाबाई धोतरे (५५) यांचे दोन दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. अंत्यविधी प्रशासनाने केला. अंत्यविधीनंतर धोतरे कुटुंबीय गावात परतले. तेव्हा आम्हांला दोन दिवस कोणी पाणी दिले नाही, मदत केली नाही, अशी तक्रार या कुटुंबीयांची होती. धोतरे कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक आणि इतर वारणी गावापासून २ किलोमीटरवर असलेल्या वस्तीवर राहतात. या कुटुंबातील चौघांपैकी दोघेजण अंध असून, दोघांना कमी दिसते.

यासंदर्भात नायब तहसीलदार किशोर सानप यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, सरपंचांसह आम्ही या वस्तीला भेट दिली. त्यांना सार्वजनिक ठिकाणी हातपंपावर पाणी भरण्यास कोणीही अडथळा केला नाही. धान्य देखील दिले. तसेच सरपंचांनी ५ हजार रुपये खर्चासाठी दिले. कोणाचीही अडचण नाही. वाळीत टाकण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.

गावातील शिरूर कासार पंचायत समितीचे माजी सभापती बाबूराव केदार यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, आमचे गाव आदर्श आहे. असा प्रकार घडला नाही. ही वस्ती गावापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी पाणी दिले नाही किंवा सहकार्य केले नाही, याचा अर्थ संपूर्ण गावाने वाळीत टाकले, असा होत नाही. या लोकांना आम्ही नेहमीच मदत केली आहे. पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य दिले, खर्चासाठी ५ हजार रुपये दिले. असा आरोप करणे म्हणजे गावाची विनाकारण बदनामी होय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसट यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, वस्तीवरील शेजाऱ्यापाजाऱ्यांनी मदत केली नाही. शेजारचा बोअर मी स्वत: सुरू करून पाणी दिले. ग्रामपंचायतीच्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालावयास पाहिजे होते.