शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कोरोना मृत्यूच्या तांडवाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राखेचे ढिगारे; रक्ताचे नातेही गोठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : कोरोनाने गेल्या दीड वर्षात सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. अंबाजोगाईत गेल्या ११ महिन्यांत आठशेहून अधिक ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : कोरोनाने गेल्या दीड वर्षात सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. अंबाजोगाईत गेल्या ११ महिन्यांत आठशेहून अधिक कोरोनाने मृत्यू झाले आहेत. त्यात वयोवृद्ध, तरुण. तर कांही चिमुकल्यांचाही समावेश आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राखेचे ढिगारे जिकडे तिकडे दिसत आहेत. रक्ताचे नातेही गोठले असून, राख सावडण्यासाठी नातेवाईक पुढे येत नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेचे कर्मचारीच राखेची विल्हेवाट लावतात.

कोरोनाने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो. गेल्या ११ महिन्यांपासून हे पथक अंत्यविधीचे काम करीत आहे. अंत्यसंस्कारासाठी वेटिंग होती. मात्र, आता मृत्युदर कमी झाल्याने अंत्यविधीही घटले आहेत. एकाच दिवशी ३२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची दु्र्देैवी वेळ ही येऊन गेली. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी झाला आहे. परंतु, स्मशानात मात्र राखेचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे या ठिकाणचेच कर्मचारीच राखेची विल्हेवाट लावतात.

कोरोनामुळे रक्ताची नाती गोठली आहेत. अनेकजण तर अंत्यसंस्काराला येण्यासही नकार देत आहेत. अशाही स्थितीत नगरपरिषदेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात. अनेकदा नातेवाईक अस्थी घेऊन जाण्यासाठीही येत नाहीत. या अस्थीचे विसर्जनही पालिका कर्मचारीच करतात.

अशी लावली जाते राखेची व्हिलेवाट

मृत कोरोना व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर जमलेल्या राखेच्या ढिगाऱ्यातील अस्थी मागणाऱ्या नातेवाइकांना दिल्या जातात. नंतर ही राख अग्निशामकाच्या पाण्याच्या पंपाद्वारे जवळच असलेल्या खड्यात भरली जाते. एक खड्डा भरला की दुसरा जेसीबीच्या साहाय्याने केला जातो. नंतर तो परिसर सॅनिटायझर करून स्वच्छ केला जातो. पाण्यामुळे ती राख दबली जाते. तो खड्डा पुन्हा काही दिवसांनंतर मातीच्या साहाय्याने बुजविण्यात येतो.

स्वतंत्र स्मशानभूमी

कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांसाठी अंबाजोगाई शहरापासून पाच कि.मी. अंतरावर मांडवा रोड परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण करण्यात आली आहे. मोठे शेड बांधण्यात आले असून, एकाचवेळी १५ ते २० जणांवर अंत्यसंस्कार होतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना बाधित होऊन मृत पावलेल्या ८०० रुग्णांवर आजपर्यंत याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत.

अस्थींचे असे होते विसर्जन

कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या अस्थी मागितलेल्या नातेवाइकांना दिल्या जातात. जे नातेवाईक येत नाहीत त्या अस्थींचे कर्मचारीच विसर्जन करतात.

काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

१) कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. दररोज डोळ्यासमोर मृतदेह जळताना दिसत आहेत. पूर्वी दिवसात तीन ते चार जणांवर अंत्यसंस्कार व्हायचे. आता १५ ते २०जणांवर होतात. स्मशानभूमीत कायम आग धगधगत असल्याचे पाहून मन खिन्न होते.

- रणधीर सोनवणे

२) वर्षभरात पूर्वी जेवढे अंत्यसंस्कार होत होते. तेवढे आता एका महिन्यात होत आहेत. दररोज मृतांवर अंत्यसंस्कार होताना पाहून मन विचलित होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अनेकदा स्वछता करताना राख उडते; पण आता कामाची सवय झाली आहे.

- लक्ष्मण जोगदंड

३) अंबाजोगाईत कोरोनावरील उपचारांसाठी दूर दूरहून लोक येतात. त्यांना अंत्यविधीची जागाही लवकर सापडत नाही. स्मशानभूमीकडे आल्यानंतर इथली अवस्था पाहून अनेकांचे मन हेलावून जाते. आम्हालाच नातेवाईक समजून त्यांना धीर द्यावा लागतो.

- शेख जावेद