शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

कोरोना मृत्यूच्या तांडवाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राखेचे ढिगारे; रक्ताचे नातेही गोठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : कोरोनाने गेल्या दीड वर्षात सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. अंबाजोगाईत गेल्या ११ महिन्यांत आठशेहून अधिक ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : कोरोनाने गेल्या दीड वर्षात सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. अंबाजोगाईत गेल्या ११ महिन्यांत आठशेहून अधिक कोरोनाने मृत्यू झाले आहेत. त्यात वयोवृद्ध, तरुण. तर कांही चिमुकल्यांचाही समावेश आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राखेचे ढिगारे जिकडे तिकडे दिसत आहेत. रक्ताचे नातेही गोठले असून, राख सावडण्यासाठी नातेवाईक पुढे येत नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेचे कर्मचारीच राखेची विल्हेवाट लावतात.

कोरोनाने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो. गेल्या ११ महिन्यांपासून हे पथक अंत्यविधीचे काम करीत आहे. अंत्यसंस्कारासाठी वेटिंग होती. मात्र, आता मृत्युदर कमी झाल्याने अंत्यविधीही घटले आहेत. एकाच दिवशी ३२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची दु्र्देैवी वेळ ही येऊन गेली. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी झाला आहे. परंतु, स्मशानात मात्र राखेचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे या ठिकाणचेच कर्मचारीच राखेची विल्हेवाट लावतात.

कोरोनामुळे रक्ताची नाती गोठली आहेत. अनेकजण तर अंत्यसंस्काराला येण्यासही नकार देत आहेत. अशाही स्थितीत नगरपरिषदेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात. अनेकदा नातेवाईक अस्थी घेऊन जाण्यासाठीही येत नाहीत. या अस्थीचे विसर्जनही पालिका कर्मचारीच करतात.

अशी लावली जाते राखेची व्हिलेवाट

मृत कोरोना व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर जमलेल्या राखेच्या ढिगाऱ्यातील अस्थी मागणाऱ्या नातेवाइकांना दिल्या जातात. नंतर ही राख अग्निशामकाच्या पाण्याच्या पंपाद्वारे जवळच असलेल्या खड्यात भरली जाते. एक खड्डा भरला की दुसरा जेसीबीच्या साहाय्याने केला जातो. नंतर तो परिसर सॅनिटायझर करून स्वच्छ केला जातो. पाण्यामुळे ती राख दबली जाते. तो खड्डा पुन्हा काही दिवसांनंतर मातीच्या साहाय्याने बुजविण्यात येतो.

स्वतंत्र स्मशानभूमी

कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांसाठी अंबाजोगाई शहरापासून पाच कि.मी. अंतरावर मांडवा रोड परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण करण्यात आली आहे. मोठे शेड बांधण्यात आले असून, एकाचवेळी १५ ते २० जणांवर अंत्यसंस्कार होतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना बाधित होऊन मृत पावलेल्या ८०० रुग्णांवर आजपर्यंत याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत.

अस्थींचे असे होते विसर्जन

कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या अस्थी मागितलेल्या नातेवाइकांना दिल्या जातात. जे नातेवाईक येत नाहीत त्या अस्थींचे कर्मचारीच विसर्जन करतात.

काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

१) कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. दररोज डोळ्यासमोर मृतदेह जळताना दिसत आहेत. पूर्वी दिवसात तीन ते चार जणांवर अंत्यसंस्कार व्हायचे. आता १५ ते २०जणांवर होतात. स्मशानभूमीत कायम आग धगधगत असल्याचे पाहून मन खिन्न होते.

- रणधीर सोनवणे

२) वर्षभरात पूर्वी जेवढे अंत्यसंस्कार होत होते. तेवढे आता एका महिन्यात होत आहेत. दररोज मृतांवर अंत्यसंस्कार होताना पाहून मन विचलित होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अनेकदा स्वछता करताना राख उडते; पण आता कामाची सवय झाली आहे.

- लक्ष्मण जोगदंड

३) अंबाजोगाईत कोरोनावरील उपचारांसाठी दूर दूरहून लोक येतात. त्यांना अंत्यविधीची जागाही लवकर सापडत नाही. स्मशानभूमीकडे आल्यानंतर इथली अवस्था पाहून अनेकांचे मन हेलावून जाते. आम्हालाच नातेवाईक समजून त्यांना धीर द्यावा लागतो.

- शेख जावेद